शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सन्मानाची जबाबदारी सर्वांचीच

By admin | Updated: August 5, 2016 01:59 IST

मानवी साखळीसाठी कोल्हापूरकर सज्ज : समानतेची बीजे रुजण्यासाठी उपक्रम

कोल्हापूर : महिला किंवा मुलीवर अत्याचार झाला की तेवढ्या कालावधीपुरते महिलांना संरक्षणाचे धडे दिले जातात. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती. महिलांना स्वसंरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजेच; पण त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, ही जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे. म्हणूनच साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या दारात होणाऱ्या स्त्रीसन्मानाच्या या मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. स्त्री-पुरुषाचे नाते कधी आई-वडील, पती-पत्नी, गुरू-शिष्य, भाऊ-बहीण, तर कधी मित्रत्वाचे. प्रत्येक नात्याला वेगळा रंग. या सगळ्या नात्यांत मुख्य धागा असतो स्त्रीसन्मानाचा. केवळ चूल आणि मुलाची सीमारेषा आखून दिलेल्या समाजात महिलांनी कर्तृत्वातून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे कुटुंबातील अवहेलनेपासून ते छेडछाड, अन्याय-अत्याचारापर्यंतच्या घटनांनी एक असुरक्षिततेची भावना मन पोखरून टाकते. हे चित्र बदलायचे असेल तर महिलांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाच्या मनात स्त्रीबद्दलचा आदर आणि समानतेची बीजे रुजविली पाहिजेत, या जाणिवेतून ‘लोकमत’ने उद्या, शनिवारी स्त्रीसन्मानाच्या मानवी साखळीचे आयोजन केले आहे. भवानी मंडपात सकाळी १० वाजता हा उपक्रम होणार आहे. महिलांचा विषय आहे म्हणून केवळ महिलांनीच उपक्रम घ्यायचे ही विचारसरणी बदलण्यासाठी ‘लोकमत’चे व्यासपीठ सज्ज झाले आहे. म्हणूनच या मानवी साखळीत लहान मुलांपासून, प्रौढांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात. प्रबोधनाची सुरुवात शालेय स्तरापासून सुरू करीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी होत आहेत. तुम्हीही या आणि चळवळीचा एक भाग बना, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.आजकाल मैत्री म्हणजे हातात बांधलेले फ्रेंडशिप बॅँड, भरपूर मित्र-मैत्रिणी, जल्लोष असे समीकरण झाले आहे; पण मैत्री म्हणजे सुरक्षिततेची अनुभूती देणारी भावना. या दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने आयोजित केलेली साखळी मानवतेच्या नात्याला जोडते. हा आवाज समस्त पुरुषांविरुद्धचा नाही, तर त्यांच्यातील काहीजणांमध्ये असलेल्या विकृतिविरोधातला आहे. - वारणा वडगावकर, सामाजिक कार्यकर्त्यापुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यातून महिला-मुलींवर अत्याचार होतात. आता मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा अव्वल आहेत. त्या द्वेषाच्या भावनेतूनही अशा घटना घडतात. ही मानवी साखळी मुला-मुलीतला भेद विसरायला लावणार आहे. स्त्रीसन्मानाचे, मैत्रीचे नाते निर्माण करणार आहे. - उमा इंगळे, नगरसेविका