शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

महिला सन्मानाची जबाबदारी सर्वांचीच

By admin | Updated: August 5, 2016 01:59 IST

मानवी साखळीसाठी कोल्हापूरकर सज्ज : समानतेची बीजे रुजण्यासाठी उपक्रम

कोल्हापूर : महिला किंवा मुलीवर अत्याचार झाला की तेवढ्या कालावधीपुरते महिलांना संरक्षणाचे धडे दिले जातात. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती. महिलांना स्वसंरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजेच; पण त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, ही जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे. म्हणूनच साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या दारात होणाऱ्या स्त्रीसन्मानाच्या या मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. स्त्री-पुरुषाचे नाते कधी आई-वडील, पती-पत्नी, गुरू-शिष्य, भाऊ-बहीण, तर कधी मित्रत्वाचे. प्रत्येक नात्याला वेगळा रंग. या सगळ्या नात्यांत मुख्य धागा असतो स्त्रीसन्मानाचा. केवळ चूल आणि मुलाची सीमारेषा आखून दिलेल्या समाजात महिलांनी कर्तृत्वातून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे कुटुंबातील अवहेलनेपासून ते छेडछाड, अन्याय-अत्याचारापर्यंतच्या घटनांनी एक असुरक्षिततेची भावना मन पोखरून टाकते. हे चित्र बदलायचे असेल तर महिलांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाच्या मनात स्त्रीबद्दलचा आदर आणि समानतेची बीजे रुजविली पाहिजेत, या जाणिवेतून ‘लोकमत’ने उद्या, शनिवारी स्त्रीसन्मानाच्या मानवी साखळीचे आयोजन केले आहे. भवानी मंडपात सकाळी १० वाजता हा उपक्रम होणार आहे. महिलांचा विषय आहे म्हणून केवळ महिलांनीच उपक्रम घ्यायचे ही विचारसरणी बदलण्यासाठी ‘लोकमत’चे व्यासपीठ सज्ज झाले आहे. म्हणूनच या मानवी साखळीत लहान मुलांपासून, प्रौढांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात. प्रबोधनाची सुरुवात शालेय स्तरापासून सुरू करीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी होत आहेत. तुम्हीही या आणि चळवळीचा एक भाग बना, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.आजकाल मैत्री म्हणजे हातात बांधलेले फ्रेंडशिप बॅँड, भरपूर मित्र-मैत्रिणी, जल्लोष असे समीकरण झाले आहे; पण मैत्री म्हणजे सुरक्षिततेची अनुभूती देणारी भावना. या दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने आयोजित केलेली साखळी मानवतेच्या नात्याला जोडते. हा आवाज समस्त पुरुषांविरुद्धचा नाही, तर त्यांच्यातील काहीजणांमध्ये असलेल्या विकृतिविरोधातला आहे. - वारणा वडगावकर, सामाजिक कार्यकर्त्यापुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यातून महिला-मुलींवर अत्याचार होतात. आता मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा अव्वल आहेत. त्या द्वेषाच्या भावनेतूनही अशा घटना घडतात. ही मानवी साखळी मुला-मुलीतला भेद विसरायला लावणार आहे. स्त्रीसन्मानाचे, मैत्रीचे नाते निर्माण करणार आहे. - उमा इंगळे, नगरसेविका