शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

समन्यायी पाणी संकल्पास प्रतिसाद

By admin | Updated: September 24, 2014 00:26 IST

हजारो नागरिकांचा सहभाग : वसुंधरा पाणी परिषदेसह पर्यावरण निसर्गप्रेमी संस्थांचा उपक्रम

कोल्हापूर : मी पाणी काटकसरीने जपून वापरीन, पाण्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन, असा संकल्प आज, मंगळवारी हजारो नागरिकांनी केला. निमित्त होते समन्यायी पाणी वितरण संकल्पनेचे.वसुंधरा पाणी परिषद, भारतीय जलसंस्कृती मंडळ, टीक नेचर क्लब आणि विविध पर्यावरण, निसर्ग संस्थांतर्फे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत विविध ठिकाणी आज सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे स्तब्ध राहून काटकसरीने पाणी वापरण्याचा संकल्प केला. वर्षातील दिवस आणि रात्र समसमान असलेला दिवस म्हणजे २३ सप्टेंबर होय. या दिवसाचे प्रतीक म्हणून जिल्ह्यात ‘समन्यायी पाणी वितरण’ या संकल्पनेचा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत दिवसभरात आपल्या सोयीनुसार अनेक नागरिकांनी आपले काम दोन मिनिटे बंद ठेवून तसेच सर्वांना सोयीस्कर अशा ठिकाणी एकत्रित येऊन शुद्ध पाण्याच्या मूलभूत हक्कांसाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात त्याग केलेल्या, कष्ट सहन केलेल्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटे उभे राहून स्तब्धता पाळली आणि त्यांनी पाणी काटकसरीने वापरण्याबाबत संकल्प केला. या उपक्रमात अनेक शाळा, जिल्हा परिषदेचे विविध विभाग सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)असा होता संकल्प....मी पाणी काटकसरीने जपून वापरीन. त्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. त्याचे समन्यायी तत्त्वावर वितरण करण्यासाठी आणि सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल, हे पाहण्यासाठी मी सतत जागरूक असेन. मी आवश्यक तेथे झाडे लावण्यास, ती जगविण्यास, सहकार्य आणि श्रमदान करीन. माझ्या गावातील प्रत्येकजण समृद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, अशिक्षित असणार नाही, हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.पाणी काटकसरीने जपून वापरीन, असा संकल्प एक दिवस करून चालणार नाही; तर प्रत्येक नागरिकाने तो वर्र्षभर केला पाहिजे. हा संकल्प स्वत:पुरता मर्यादित न ठेवता सर्वांना दिला पाहिजे. या उपक्रमात जिल्ह्णातील सुमारे पाच हजार नागरिक तरी नक्कीच सहभागी झाले असतील. - प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे अध्यक्ष, भारतीय जल संस्कृती मंडळ असा होता संकल्प....मी पाणी काटकसरीने जपून वापरीन. त्याचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेईन. माझ्या गावात, शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडविण्याचा, साठविण्याचा आणि जमिनीत मुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. त्याचे समन्यायी तत्त्वावर वितरण करण्यासाठी आणि सर्वांना पुरेसे पाणी कसे मिळेल, हे पाहण्यासाठी मी सतत जागरूक असेन. मी आवश्यक तेथे झाडे लावण्यास, ती जगविण्यास, सहकार्य आणि श्रमदान करीन. माझ्या गावातील प्रत्येकजण समृद्ध कसा होईल, माझ्या गावात एकही माणूस दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, अशिक्षित असणार नाही, हे मी पाहीन. माझा संपूर्ण गाव आणि देश समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.