शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या

By admin | Updated: July 20, 2014 22:16 IST

नारायण राणेंचे कार्यकर्त्यांना आदेश : कणकवलीतील स्नेहमेळाव्यात प्रतिपादन

कणकवली : जर कोणी तुमच्यावर हात उगारत असेल तर त्याचे हात खांद्यापासून वेगळे करा. त्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. कार्यकर्ता शूर असला पाहिजे. न सांगता कराल तर कौतुकही होईल आणि सत्कारही. विरोधकांना जशासतसे उत्तर द्या. अशा शब्दात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. साधा सरपंचदेखील राजीनामा देत नाही. मात्र, मंत्रीपदाचा राजीनामा मी देत आहे. माझा संघर्ष करणाऱ्यांचा पिंड आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनीअरिंग कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता स्नेहमेळाव्यात नारायण राणे बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, उपाध्यक्ष संदेश सावंत, सेवादलचे अध्यक्ष वसंत केसरकर, शाहू सावंत, संदीप कुडतरकर, संजय पडते, विकास सावंत, दत्ता सामंत, अशोक सावंत, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, अंकुश जाधव, जयेंद्र रावराणे, संदीप कदम, अशोक तोडणकर, बाळू कोळंबकर, अस्मिता बांदेकर, श्रावणी नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हे एक मंदिर असून येथील नागरिक माझ्यासाठी देवतेप्रमाणे आहेत. त्यांना नमस्कार करण्यासाठी गेले दोन दिवस जिल्हा दौरा केला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी जे पाऊल टाकेन त्यामध्ये निश्चितच यश मिळेल असा विश्वास आता निर्माण झाला आहे. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना राणे म्हणाले, कोकणच्या विकासासाठी आपण काय केले हे प्रथम जाहीर करावे. राऊत यांची माझ्यावर टीका करण्याची लायकी नाही. आमचे सरपंच तरी कामात तसेच दिसायलातरी स्मार्ट असतात. मात्र तेवढेही राऊत नाहीत. सोमवारी मी जो निर्णय घेईन त्यावेळी जे घडेल ते तुम्ही पहालच. दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, केसरकर गोव्यात राहतात मग ते सिंधुदुर्ग कसा दहशतवादमुक्त करणार? सावंतवाडी शहराबाहेर ते नेते आहेत हे कोणालाही माहिती नाही. त्यांचे काय कार्य आहे ते प्रथम त्यांनी जाहीर करावे. नंतरच माझ्यावर टीका करावी. शिवसेनेचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे एवढेच त्यांना समजते. ते म्हणाले गेल्या २५ वर्षात येथील विकासाचा कळस मी उभारला. मात्र त्याला सुरुंग कोणी लावला? हे माहित नाही. यापुढे मी जी वाटचाल करेन ती कोकणाबरोबरच महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल. त्यामुळे तुम्ही फक्त साथ द्या, असे भावनिक आवाहनही नारायण राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. (वार्ताहर) ---माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आज समर्थन आणि पाठिंबा द्यायला कणकवलीत आले आहेत. या सर्वांचे प्रेम मी जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीसुद्धा हे प्रेम असेच वृद्धींगत राहण्यासाठी कार्यरत रहा. प्रेमाचा झरा कधीही आटू देवू नका. नुसते देखल्या देवा दंडवत नको, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.राजन तेली, काका कुडाळकरांची अनुपस्थिती--- कणकवली येथे आज झालेल्या स्नेहसंमेलनासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, प्रवक्ते काका कुडाळकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजन तेली उपस्थित नव्हते. नारायण राणे गेले दोन दिवस सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना हे दोन्ही पदाधिकारी त्यांच्या दौऱ्यात कुठेही सहभागी नव्हते आणि स्नेहसंमेलनासही उपस्थित नव्हते.काँग्रेस जिवंत ठेवण्याची ताकद : प्रवीण भोसले----प्रविण भोसले म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले निकाल अपेक्षित असतील तर काँग्रेसने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. काँग्रेस जिवंत ठेवण्याची ताकद राणे यांच्यात आहे.स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्र आतुर : सिद्धार्थ बनसोडे-----खास अमरावती येथून आलेले सिद्धार्थ बनसोडे म्हणाले, या स्नेहमेळाव्यासारखे मेळावे आयोजित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राणे यांची वाट पहात आहे. राणे यांनी कुठलाही निर्णय घ्यावा आणि आम्हाला आदेश द्यावेत. त्याप्रमाणे आम्ही काम करु.दीपक केसरकरांनी राणेंचे पाय धरले होते : कुडतरकरसंदीप कुडतरकर म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण सिंधुदुर्गच्या सुपुत्राने ढवळून टाकले आहे. नारायण राणे यांच्यासारखा नेता आपण पाहिला नाही. त्यांच्यामुळेच काँग्रेसमध्ये आम्हाला प्रतिष्ठा मिळाली. आमदार होता यावे यासाठी मागील निवडणुकीत दीपक केसरकर यांनी राणेंचे पाय धरले होते. मात्र, आता ते हे विसरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी नारायण राणे यांच्या पाठिशी राहूया.नारायण राणेंवर झाला अन्याय : जयेंद्र परूळेकरडॉ. जयेंद्र परुळेकर म्हणाले, सध्या राजकारणात मंथन सुरु झाले आहे. हे मंथन घडविणारे राणे आहेत. पूर्वी कोकणाला मागासलेले म्हटले जायचे. परंतु राणे यांच्यामुळे येथील विकास झाला आहे. ९ वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांना दिली गेलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्याच्या पाठिशी आपण ठाम राहिले पाहिजे.काँग्रेसने संधी देणे आवश्यक : विकास सावंतविकास सावंत म्हणाले, नारायण राणे यांना काँग्रेसने योग्य संधी दिली नाही. आतापर्यंत राणे यांनी लोकोपयोगी निर्णय घेतले. मात्र, त्यांच्यावर अन्याय होत राहिला आहे. राणेंसारख्या खंबीर नेत्याच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे.राणेंनी लढवय्याप्रमाणे लढत रहावे : वसंत केसरकरवसंत केसरकर म्हणाले, गेल्या ९ वर्षात राणेंना काँग्रेसने न्याय दिला नाही. राजकारणाचे व्यापारीकरण करणारे कार्यकर्ते आता मागे पडले असून कष्ट करणारा कार्यकर्ता पुढे आला आहे. हे सर्व कार्यकर्ते राणे यांच्या निश्चितपणे पाठिशी राहतील. त्यांनी लढवय्यासारखे लढत रहावे.