शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

संकल्प आरोग्याचा

By admin | Updated: January 4, 2017 00:01 IST

बालस्वास्थ

सरते वर्ष २०१६ ला निरोप देऊन सन २०१७चे आपण सर्वांनी आपापल्या पध्दतीने स्वागत केले. प्रतिवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना नवनवीन संकल्प सोडले जातात, परंतु अनेकांचे हे संकल्प जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मागे पडतात. कारण संकल्प केला तरी तो पूर्णत्वास नेण्यासाठी जी मनाची जिगर लागते ती अनेकांकडे नसते. त्याचप्रमाणे जुन्या वर्षातील चांगल्या-वाईट घटनांच्या जमा-खर्चाचा आढावा घेतला जातो. सरत्या वर्षात काय कमावले व काय गमावले याचा ताळमेळ मांडला जातो. अनेकांच्या बाबतीत हा आर्थिक उलाढालीचा असतो, तर काही जणांसाठी तो प्रिय-अप्रिय घटनांचा असतो; पण फारच कमी लोक आरोग्याचा जमा-खर्च मांडतात. सरत्या वर्षानुसार वय वाढत जाते. वाढत्या वयानुसार सहसा आरोग्याचा आलेख छोटा होत जातो आणि आजारांचा आलेख मात्र मोठा होत जातो. सर्व आजार औषधाने बरे होतात, अशा भ्रामक समजुतीमुळे, आरोग्य समजावून घेऊन आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा ‘आजार आल्यावर बघू’ या समजुतीवर जास्त विश्वास ठेवला जातो. गेल्या पन्नास वर्षांच्या आजारांचा आढावा घेतल्यास संसर्गजन्य आजारांवर आपण चांगल्यारितीने नियंत्रण मिळविले आहे. देवी, पोलिओ यांचे निर्मूलन झाले आहे. गोवर, घटसर्प, डांग्या खोकला या आजारांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे. कावीळ, मेंदूज्वर, न्यूमोनिया, जुलाब, कांजिण्या, पोलिओ यासारख्या आजारांवर प्रभावी लस उपलब्ध झाल्याने या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या आयुर्मानात मोठी वाढ झाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी सन १९४७ मध्ये ३१ वर्षांची असणारी आयुर्मर्यादा आज ६६ वयापर्यंत पोहोचली आहे. विविध शासकीय आरोग्य योजना सरकारी व खासगी आरोग्य केंद्रांमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याने औषधोपचार सुलभ झाले आहेत.परंतु याच कालावधीमध्ये जीवनशैलीशी निगडित मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, दमा, लठ्ठपणा यासारख्या जंतूविरहित आजारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. वृद्धापकाळामधील वैद्यकीय आजार, प्रदूषणाशी संबंधित विकार, एचआयव्ही संसर्ग यासारख्या वैद्यकीय समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. जंतूजन्य आजारांसाठी रामबाण ठरलेली जंतुनाशक औषधांची धारदार तलवार त्याच्या अतिरेकी वापराने बोथट होत चालली आहे. आपले आयुर्मान वाढले; पण या आरोग्य समस्यांमुळे ते वाढलेले आयुष्य आरोग्यदायी व चैतन्यमय झाले का, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार टाळणे ही आरोग्यासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. पुरातन भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार आणि योग्य आचरण यांमुळे निरोगी दीर्घायुष्य जगणे शक्य आहे. या नववर्षाचे स्वागत करताना आपल्या विचारांची दिशा रोगाकडून आरोग्याकडे वळवून निरोगी आरोग्याचा संकल्प करूया. मी या सदरातून वर्षभर त्यासंबंधीच तुमच्याशी हितगुज करणार आहे. आरोग्य म्हटले की सर्वांच्याच दृष्टीने त्यास सारखेच महत्त्व, परंतु मुख्यत: लहान मुलांच्या आरोग्याविषयी लोकांत अधिक जागरूकतेची गरज आहे. त्यामुळे लहान मुलांचे आजार, त्याविषयी घ्यावयाची काळजी, पालकांच्या मनांत असलेल्या विविध शंका, त्याच्या संगोपनाविषयीच्या काही चुकीच्या परंतु प्रथा म्हणून चालत आलेल्या प्रथा-परंपरा या सर्वांबाबत मी तुमच्याशी संवाद साधणार आहे.                                                                                                                                        - डॉ. मोहन पाटील (डॉ. मोहन पाटील हे नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत.त्यांनी सीपीआरमध्येही बालरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.)