शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

‘भोगावती’च्या गतवैभवासाठी शर्थीचे प्रयत्न- विविध मार्गांनी वीस कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:50 IST

एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळ सक्रिय मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला

सुनील चौगले ।भोगावती : एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे. कारखान्याच्या गतवैभवासाठी त्यांनी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन शर्थीचे प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत सामान्य माणसांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना भक्कम केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, ही खूणगाठ बांधूनच ते कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांत विविध मार्गांनी कारखान्याची २० कोटी रुपयांची बचत केली आहे.

साखर कारखानदारी कशा पद्धतीने चालवायची? उत्तम प्रशासन कसे असते? हे पाहण्यासाठी राज्यातील कारखानदार ‘भोगावती’ला भेट देत होते. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झेपावत होती. या कालावधीत कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार पटकाविले. ‘भोगावती’च्या बळावरच परिसरातील सामान्य माणसाला ताकद देण्याचे काम पी. एन. पाटील यांनी केले. रोजगार असो, शेती, दुग्ध व्यवसाय असो; या माध्यमातून सामान्य माणसाला उभे करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले; पण मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला. सभासद, कामगारांची अवहेलना झाली आणि प्रशासक आले.

जिल्ह्यातील दोन-तीन कारखान्यांची उदाहरणे डोळ्यांसमोर असल्याने सभासद धास्तावले होते. प्रशासकीय कालावधी संपुष्टात येऊन, कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करण्याचे नियोजन होते; पण आता तुम्ही नेतृत्व न करता त्यांच्यावरच कारभाराची जबाबदारी टाकण्याचा आग्रह सभासदांनी केला. सभासदांच्या रेट्याने पाटील यांना स्वत: रिंग्ांणात उतरले. सभासदांनी दाखविलेल्या मोठ्या विश्वासाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले खरे; पण याच कालावधीत देशातील साखर उद्योग अडचणीत आला. साखरेच्या दरातील चढउताराने उद्योग उद्ध्वस्त होतो की काय? अशी परिस्थिती असताना कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन त्यांनी अडचणींवर मात करण्यास सुरुवात केली. कारखान्याची कोणतीही सेवा घ्यायची नाही, याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केल्याने संचालकांनाही ते आपोआपच लागू झाले. गेले दोन गळीत हंंगाम त्यांनी ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांत विविध मार्गांनी सुमारे २० कोटींची बचत केली. सध्या विविध संकटे त्यांच्यासमोर असली तरी सभासद व कामगारांच्या विश्वासावर याही संकटातूनही ते मार्ग काढतील.संचालक मंडळाकडून कारखान्याची कोणतीही सुविधा घेतली जात नाही. त्यामुळे मोठी बचत झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर