शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

‘भोगावती’च्या गतवैभवासाठी शर्थीचे प्रयत्न- विविध मार्गांनी वीस कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:50 IST

एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळ सक्रिय मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला

सुनील चौगले ।भोगावती : एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे. कारखान्याच्या गतवैभवासाठी त्यांनी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन शर्थीचे प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत सामान्य माणसांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना भक्कम केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, ही खूणगाठ बांधूनच ते कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांत विविध मार्गांनी कारखान्याची २० कोटी रुपयांची बचत केली आहे.

साखर कारखानदारी कशा पद्धतीने चालवायची? उत्तम प्रशासन कसे असते? हे पाहण्यासाठी राज्यातील कारखानदार ‘भोगावती’ला भेट देत होते. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झेपावत होती. या कालावधीत कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार पटकाविले. ‘भोगावती’च्या बळावरच परिसरातील सामान्य माणसाला ताकद देण्याचे काम पी. एन. पाटील यांनी केले. रोजगार असो, शेती, दुग्ध व्यवसाय असो; या माध्यमातून सामान्य माणसाला उभे करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले; पण मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला. सभासद, कामगारांची अवहेलना झाली आणि प्रशासक आले.

जिल्ह्यातील दोन-तीन कारखान्यांची उदाहरणे डोळ्यांसमोर असल्याने सभासद धास्तावले होते. प्रशासकीय कालावधी संपुष्टात येऊन, कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करण्याचे नियोजन होते; पण आता तुम्ही नेतृत्व न करता त्यांच्यावरच कारभाराची जबाबदारी टाकण्याचा आग्रह सभासदांनी केला. सभासदांच्या रेट्याने पाटील यांना स्वत: रिंग्ांणात उतरले. सभासदांनी दाखविलेल्या मोठ्या विश्वासाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले खरे; पण याच कालावधीत देशातील साखर उद्योग अडचणीत आला. साखरेच्या दरातील चढउताराने उद्योग उद्ध्वस्त होतो की काय? अशी परिस्थिती असताना कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन त्यांनी अडचणींवर मात करण्यास सुरुवात केली. कारखान्याची कोणतीही सेवा घ्यायची नाही, याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केल्याने संचालकांनाही ते आपोआपच लागू झाले. गेले दोन गळीत हंंगाम त्यांनी ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांत विविध मार्गांनी सुमारे २० कोटींची बचत केली. सध्या विविध संकटे त्यांच्यासमोर असली तरी सभासद व कामगारांच्या विश्वासावर याही संकटातूनही ते मार्ग काढतील.संचालक मंडळाकडून कारखान्याची कोणतीही सुविधा घेतली जात नाही. त्यामुळे मोठी बचत झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर