शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’च्या गतवैभवासाठी शर्थीचे प्रयत्न- विविध मार्गांनी वीस कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:50 IST

एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळ सक्रिय मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला

सुनील चौगले ।भोगावती : एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे. कारखान्याच्या गतवैभवासाठी त्यांनी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन शर्थीचे प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत सामान्य माणसांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना भक्कम केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, ही खूणगाठ बांधूनच ते कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांत विविध मार्गांनी कारखान्याची २० कोटी रुपयांची बचत केली आहे.

साखर कारखानदारी कशा पद्धतीने चालवायची? उत्तम प्रशासन कसे असते? हे पाहण्यासाठी राज्यातील कारखानदार ‘भोगावती’ला भेट देत होते. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झेपावत होती. या कालावधीत कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार पटकाविले. ‘भोगावती’च्या बळावरच परिसरातील सामान्य माणसाला ताकद देण्याचे काम पी. एन. पाटील यांनी केले. रोजगार असो, शेती, दुग्ध व्यवसाय असो; या माध्यमातून सामान्य माणसाला उभे करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले; पण मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला. सभासद, कामगारांची अवहेलना झाली आणि प्रशासक आले.

जिल्ह्यातील दोन-तीन कारखान्यांची उदाहरणे डोळ्यांसमोर असल्याने सभासद धास्तावले होते. प्रशासकीय कालावधी संपुष्टात येऊन, कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करण्याचे नियोजन होते; पण आता तुम्ही नेतृत्व न करता त्यांच्यावरच कारभाराची जबाबदारी टाकण्याचा आग्रह सभासदांनी केला. सभासदांच्या रेट्याने पाटील यांना स्वत: रिंग्ांणात उतरले. सभासदांनी दाखविलेल्या मोठ्या विश्वासाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले खरे; पण याच कालावधीत देशातील साखर उद्योग अडचणीत आला. साखरेच्या दरातील चढउताराने उद्योग उद्ध्वस्त होतो की काय? अशी परिस्थिती असताना कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन त्यांनी अडचणींवर मात करण्यास सुरुवात केली. कारखान्याची कोणतीही सेवा घ्यायची नाही, याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केल्याने संचालकांनाही ते आपोआपच लागू झाले. गेले दोन गळीत हंंगाम त्यांनी ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांत विविध मार्गांनी सुमारे २० कोटींची बचत केली. सध्या विविध संकटे त्यांच्यासमोर असली तरी सभासद व कामगारांच्या विश्वासावर याही संकटातूनही ते मार्ग काढतील.संचालक मंडळाकडून कारखान्याची कोणतीही सुविधा घेतली जात नाही. त्यामुळे मोठी बचत झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर