शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पूर्ण विचार करुनच राजीनाम्याचा निर्णय

By admin | Updated: July 20, 2014 22:18 IST

नारायण राणे : सावंतवाडीतील सभेत प्रतिपादन

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीमधील नीलेश राणे यांच्या पराभवामुळे जन्मभूमीतच माझा पराभव झाला आहे. विकास कामे करूनही अनोळखी व्यक्तीला दीड लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिले आहे. हायकमांडनेही मुख्यमंत्री करण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे पूर्ण विचार करुनच मंत्रिपदाचा राजीनामा सोमवारी देणार असल्याचे नारायण राणे यांनी जाहीर सभेत सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याबाबत राणे यांनी जनतेचे आभारही मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, अशोक सावंत, चंदू राणे, संदेश पारकर, वसंत केसरकर, संजय पडते, दत्ता सामंत, संदीप कुडतरकर, मिलिंद कुलकर्णी, बाळा गावडे, संजू परब आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, राजीनामा देण्याचा निर्णय संपूर्ण विचार करूनच घेतला आहे. राजीनाम्यामुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. २००५ साली काँग्रेसमध्ये आल्यानंतर ९ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. निष्ठेमध्ये संशय यावा, असे कोणतेही काम केले नाही. मात्र, मी हायकमांडवर नाराज आहे. गेल्या २५ वर्षात सात निवडणुका जिंकल्या. परंतु यावेळी मुलाचा पराभव झाल्याचे कानावर पडताच राजीनामा दिला होता. मात्र, यातून काही मार्ग काढू, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. परंतु ते आश्वासन अद्यापही पाळले नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. केसरकर, उध्दव ठाकरेंवर टीकादहशत संपविणार, असे म्हणणारे आमदार केसरकर ताठ मानेने उभे राहून माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत. मग दहशत काय संपविणार, असा कडक हल्लाबोल राणेंनी केसरकरांवर केला. तसेच उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना, ‘मातोश्री’ वर राहून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे उध्दव ठाकरेंना माहीत आहे काय, शेतकरी, मच्छीमार यांचे जीवन कसे असते, याची माहिती आहे का, फयान वादळ आले, तेव्हा तो कोठे होता, ‘मातोश्री’वर उभा राहून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या उध्दवचा निवडणुका आल्यानंतर भाषणबाजी करणे हाच विकास आहे, असा घणाघात राणे यांनी केला. (वार्ताहर) -- ज्याचे कार्य शून्य आहे, ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही, त्या विनायक राऊतला लोकांनी दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले. विकासकामे दुसऱ्याने करायची आणि निवडून अनोळखी माणसाला द्यायचे, हाच जनतेचा न्याय का, असा प्रश्न करून यासाठीच राजीनामा देणार असल्याचे राणेंनी सांगितले. भाजपच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा आहे. माझ्यावरचे कोकणच्या माणसाचे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी कदापी हरणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.