शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पूर्ण विचार करुनच राजीनाम्याचा निर्णय

By admin | Updated: July 20, 2014 22:18 IST

नारायण राणे : सावंतवाडीतील सभेत प्रतिपादन

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीमधील नीलेश राणे यांच्या पराभवामुळे जन्मभूमीतच माझा पराभव झाला आहे. विकास कामे करूनही अनोळखी व्यक्तीला दीड लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिले आहे. हायकमांडनेही मुख्यमंत्री करण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे पूर्ण विचार करुनच मंत्रिपदाचा राजीनामा सोमवारी देणार असल्याचे नारायण राणे यांनी जाहीर सभेत सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याबाबत राणे यांनी जनतेचे आभारही मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, अशोक सावंत, चंदू राणे, संदेश पारकर, वसंत केसरकर, संजय पडते, दत्ता सामंत, संदीप कुडतरकर, मिलिंद कुलकर्णी, बाळा गावडे, संजू परब आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, राजीनामा देण्याचा निर्णय संपूर्ण विचार करूनच घेतला आहे. राजीनाम्यामुळे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. २००५ साली काँग्रेसमध्ये आल्यानंतर ९ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. निष्ठेमध्ये संशय यावा, असे कोणतेही काम केले नाही. मात्र, मी हायकमांडवर नाराज आहे. गेल्या २५ वर्षात सात निवडणुका जिंकल्या. परंतु यावेळी मुलाचा पराभव झाल्याचे कानावर पडताच राजीनामा दिला होता. मात्र, यातून काही मार्ग काढू, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. परंतु ते आश्वासन अद्यापही पाळले नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. केसरकर, उध्दव ठाकरेंवर टीकादहशत संपविणार, असे म्हणणारे आमदार केसरकर ताठ मानेने उभे राहून माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत. मग दहशत काय संपविणार, असा कडक हल्लाबोल राणेंनी केसरकरांवर केला. तसेच उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना, ‘मातोश्री’ वर राहून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे उध्दव ठाकरेंना माहीत आहे काय, शेतकरी, मच्छीमार यांचे जीवन कसे असते, याची माहिती आहे का, फयान वादळ आले, तेव्हा तो कोठे होता, ‘मातोश्री’वर उभा राहून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या उध्दवचा निवडणुका आल्यानंतर भाषणबाजी करणे हाच विकास आहे, असा घणाघात राणे यांनी केला. (वार्ताहर) -- ज्याचे कार्य शून्य आहे, ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही, त्या विनायक राऊतला लोकांनी दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले. विकासकामे दुसऱ्याने करायची आणि निवडून अनोळखी माणसाला द्यायचे, हाच जनतेचा न्याय का, असा प्रश्न करून यासाठीच राजीनामा देणार असल्याचे राणेंनी सांगितले. भाजपच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा आहे. माझ्यावरचे कोकणच्या माणसाचे प्रेम कधीही कमी होणार नाही. मी कदापी हरणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.