शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

राजीनामा देणार; राजकारण सोडणार नाही

By admin | Updated: July 20, 2014 22:16 IST

नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

नारायण राणे : वेंगुर्ले येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादनवेंगुर्ले : काँग्रेस पक्षाने मला मुख्यमंत्री पद देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. कोकणातील लोकांनी मी गेली २५ वर्षे त्यांच्यासाठी काम करूनही मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली नाही. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मात्र राजकारण सोडणार नाही, असे उद्गार पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी राणे शुक्रवारपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता शनिवारी सायंकाळी उशिरा वेंगुर्ले येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनिष दळवी, शहर अध्यक्ष यशवंत परब, संदेश निकम, वसंत तांडेल, विष्णूदास कुबल, चंदू राणे, नीलेश चमणकर आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, ३० जून २००५ मध्ये मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसने मला सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ९ वर्षात चारवेळा मुख्यमंत्री करतो असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मात्र आतापर्यंत मला मुख्यमंत्री केले नाही. माझे समर्थक असलेल्या आमदारांनाही मंत्रीपद दिले नाही.काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही व ज्या कोकणला मी २५ वर्षात भरभरून दिले त्याच कोकणातील लोकांनी माझ्या मुलाचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला. याच गोष्टीमुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असलो तरी राजकारणातच राहून काम करणार आहे. माझ्या बाबतीत घडले ते भविष्यात कुणाच्याही बाबतीत घडू नये यासाठीच मी हा निर्णय घेतला असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. तालुकाध्यक्ष मनिष दळवी यांनी राणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ठाम राहणार असून सर्व कार्यकर्ते राणे यांना साथ देतील असे सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी राणे यांच्यावर काँग्रेस पक्षाने कसा अन्याय केला ते यावेळी सांगितले. (वार्ताहर) मुलाच्या पराभवास कार्यकर्ते जबाबदार: राणेसतरा हा मला शुभ अंक आहे. आणि हाच अंक वेंगुर्लेत मला अशुभ ठरावा हे माझे दुर्दैव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझा मुलगा नीलेश वेंगुर्ले तालुक्यात १७ हजार मतांनी पिछाडीवर पडला. त्यास येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदार आहेत, असे राणे म्हणाले.