शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राजीनामा देणार; राजकारण सोडणार नाही

By admin | Updated: July 20, 2014 22:16 IST

नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

नारायण राणे : वेंगुर्ले येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादनवेंगुर्ले : काँग्रेस पक्षाने मला मुख्यमंत्री पद देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. कोकणातील लोकांनी मी गेली २५ वर्षे त्यांच्यासाठी काम करूनही मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली नाही. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मात्र राजकारण सोडणार नाही, असे उद्गार पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी राणे शुक्रवारपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता शनिवारी सायंकाळी उशिरा वेंगुर्ले येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनिष दळवी, शहर अध्यक्ष यशवंत परब, संदेश निकम, वसंत तांडेल, विष्णूदास कुबल, चंदू राणे, नीलेश चमणकर आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, ३० जून २००५ मध्ये मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसने मला सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ९ वर्षात चारवेळा मुख्यमंत्री करतो असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मात्र आतापर्यंत मला मुख्यमंत्री केले नाही. माझे समर्थक असलेल्या आमदारांनाही मंत्रीपद दिले नाही.काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही व ज्या कोकणला मी २५ वर्षात भरभरून दिले त्याच कोकणातील लोकांनी माझ्या मुलाचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला. याच गोष्टीमुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असलो तरी राजकारणातच राहून काम करणार आहे. माझ्या बाबतीत घडले ते भविष्यात कुणाच्याही बाबतीत घडू नये यासाठीच मी हा निर्णय घेतला असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. तालुकाध्यक्ष मनिष दळवी यांनी राणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ठाम राहणार असून सर्व कार्यकर्ते राणे यांना साथ देतील असे सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी राणे यांच्यावर काँग्रेस पक्षाने कसा अन्याय केला ते यावेळी सांगितले. (वार्ताहर) मुलाच्या पराभवास कार्यकर्ते जबाबदार: राणेसतरा हा मला शुभ अंक आहे. आणि हाच अंक वेंगुर्लेत मला अशुभ ठरावा हे माझे दुर्दैव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझा मुलगा नीलेश वेंगुर्ले तालुक्यात १७ हजार मतांनी पिछाडीवर पडला. त्यास येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदार आहेत, असे राणे म्हणाले.