शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राजीनामा देणार; राजकारण सोडणार नाही

By admin | Updated: July 20, 2014 22:16 IST

नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

नारायण राणे : वेंगुर्ले येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादनवेंगुर्ले : काँग्रेस पक्षाने मला मुख्यमंत्री पद देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. कोकणातील लोकांनी मी गेली २५ वर्षे त्यांच्यासाठी काम करूनही मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली नाही. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मात्र राजकारण सोडणार नाही, असे उद्गार पालकमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्लेतील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काढले.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी राणे शुक्रवारपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता शनिवारी सायंकाळी उशिरा वेंगुर्ले येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदेश पारकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनिष दळवी, शहर अध्यक्ष यशवंत परब, संदेश निकम, वसंत तांडेल, विष्णूदास कुबल, चंदू राणे, नीलेश चमणकर आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, ३० जून २००५ मध्ये मी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसने मला सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ९ वर्षात चारवेळा मुख्यमंत्री करतो असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मात्र आतापर्यंत मला मुख्यमंत्री केले नाही. माझे समर्थक असलेल्या आमदारांनाही मंत्रीपद दिले नाही.काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही व ज्या कोकणला मी २५ वर्षात भरभरून दिले त्याच कोकणातील लोकांनी माझ्या मुलाचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला. याच गोष्टीमुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असलो तरी राजकारणातच राहून काम करणार आहे. माझ्या बाबतीत घडले ते भविष्यात कुणाच्याही बाबतीत घडू नये यासाठीच मी हा निर्णय घेतला असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. तालुकाध्यक्ष मनिष दळवी यांनी राणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ठाम राहणार असून सर्व कार्यकर्ते राणे यांना साथ देतील असे सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी राणे यांच्यावर काँग्रेस पक्षाने कसा अन्याय केला ते यावेळी सांगितले. (वार्ताहर) मुलाच्या पराभवास कार्यकर्ते जबाबदार: राणेसतरा हा मला शुभ अंक आहे. आणि हाच अंक वेंगुर्लेत मला अशुभ ठरावा हे माझे दुर्दैव आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माझा मुलगा नीलेश वेंगुर्ले तालुक्यात १७ हजार मतांनी पिछाडीवर पडला. त्यास येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जबाबदार आहेत, असे राणे म्हणाले.