शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बनावट सोनं तारण कर्जातून अपहार, रिझर्व्ह बँकेने कडक केले निकष

By राजाराम लोंढे | Updated: June 18, 2025 18:33 IST

मूल्यांकनही कर्जदाराच्या समोरच करावे लागणार

राजाराम लोंढेकाेल्हापूर : सहकारी बँकांच्या सोने तारण कर्जातील अपहाराला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता कडक पावले उचलली आहेत. सोने तारण कर्ज देताना पारंपरिक पद्धतीने न देता, सोनाराने बँकेत येऊन कर्जदार व बँक अधिकाऱ्यासमोर मूल्यांकन करायचे आहे. दागिना, नाण्यावर कितीपर्यंत कर्ज द्यायचे, कर्जदाराची तारण वस्तू सुरक्षित कशा प्रकारे ठेवायची? त्याची जबाबदारी बँकांवर कशी राहणार, याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.बँका, पतसंस्थांच्या एकूण कर्ज वाटपाच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक सोने तारण कर्ज असते. घरातील सोने तारण ठेवले की कर्जदाराची तातडीने गरज निघते. बँकांच्या वसुलीच्या दृष्टीने सगळ्यात सुरक्षित कर्ज असल्याने बँकांचाही त्याकडे अधिक कल असतो; पण अलीकडील काही वर्षांत सोने तारण कर्जामध्ये बँका, पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून अपहाराचे प्रकार वाढले आहेत. कर्मचारी, सोनार हे संगनमताने डल्ला मारताना दिसत आहेत.ही बाब रिझर्व्ह बँकेने गांभीर्याने घेतली असून, याबाबतचे नवीन परिपत्रक काढले आहे. कर्ज देताना चोख सोन्याचे मूल्याकंन करायचे आहे. त्याचबरोबर कर्ज परतफेडीनंतर संबधित कर्जदाराला तारण सोने परत करताना जिन्नसाच्या बँकेकडील नोंदीनुसार त्याला परत करायचे आहे. यामध्ये काही कमी आढळले तर बँकेने ते संबधित कर्जदाराला भरपाई करून द्यायचे आहे. विशेष म्हणजे बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्यांनीच जिन्नस हाताळायच्या आहेत.

एक किलोपर्यंतच्या दागिन्यांवर कर्जदागिने तारण कर्ज देताना एक किलोपर्यंत दागिन्यांवरच कर्ज द्यायचे. त्याचबरोबर नाणी असतील तर पाच तोळ्यांपर्यंत आता द्यावे लागणार आहे.

अंतर्गत लेखापरीक्षकांवर जबाबदारीबँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षकांवरही तारण जिन्नस तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अचानक तपासणी करून त्याची नोंदीप्रमाणे खातरजमा करण्याच्या सूचना त्यांना आहेत.

सोने तारणावर कर्ज देण्याचे प्रमाण..

  • व्याजासह अडीच लाख : सोन्याच्या मूल्यांकनाच्या ८५ टक्के
  • व्याजासह अडीच ते पाच लाख : मूल्यांकनाच्या ८० टक्के
  • पाच लाखाच्या वर : मूल्यांकनाच्या ७५ टक्के

तारणाची सोपी प्रक्रियासोनेतारण कर्जास सरासरी ७ ते १० टक्के व्याज दर असतो. वर्षात परतफेड करण्याची मुदत असते. सहज उपलब्ध होते आणि दागिन्याच्या किमतीच्या बाजारभावानुसार ८० टक्क्यापर्यंतची रक्कम कर्ज म्हणून मिळते म्हणून त्याकडे ओढा वाढला आहे. परंतु त्यामुळेच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. बँकेच्या सराफालाच हाताशी धरून कर्ज उचलण्याचे प्रकार सुरू झाल्याने रिझर्व्ह बँकेने त्याला चाप लावला आहे.

रिझर्व्ह बँकेचे नवीन निकष चांगले असून, त्याचे पालन बँकांनी केले पाहिजे. कर्मचारी त्याचे पालन करणार की नाही, यावर बँक व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. - अनिल नागराळे (बँकिंग तज्ज्ञ