शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Kolhapur: बनावट सोनं तारण कर्जातून अपहार, रिझर्व्ह बँकेने कडक केले निकष

By राजाराम लोंढे | Updated: June 18, 2025 18:33 IST

मूल्यांकनही कर्जदाराच्या समोरच करावे लागणार

राजाराम लोंढेकाेल्हापूर : सहकारी बँकांच्या सोने तारण कर्जातील अपहाराला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता कडक पावले उचलली आहेत. सोने तारण कर्ज देताना पारंपरिक पद्धतीने न देता, सोनाराने बँकेत येऊन कर्जदार व बँक अधिकाऱ्यासमोर मूल्यांकन करायचे आहे. दागिना, नाण्यावर कितीपर्यंत कर्ज द्यायचे, कर्जदाराची तारण वस्तू सुरक्षित कशा प्रकारे ठेवायची? त्याची जबाबदारी बँकांवर कशी राहणार, याबाबतच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.बँका, पतसंस्थांच्या एकूण कर्ज वाटपाच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक सोने तारण कर्ज असते. घरातील सोने तारण ठेवले की कर्जदाराची तातडीने गरज निघते. बँकांच्या वसुलीच्या दृष्टीने सगळ्यात सुरक्षित कर्ज असल्याने बँकांचाही त्याकडे अधिक कल असतो; पण अलीकडील काही वर्षांत सोने तारण कर्जामध्ये बँका, पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून अपहाराचे प्रकार वाढले आहेत. कर्मचारी, सोनार हे संगनमताने डल्ला मारताना दिसत आहेत.ही बाब रिझर्व्ह बँकेने गांभीर्याने घेतली असून, याबाबतचे नवीन परिपत्रक काढले आहे. कर्ज देताना चोख सोन्याचे मूल्याकंन करायचे आहे. त्याचबरोबर कर्ज परतफेडीनंतर संबधित कर्जदाराला तारण सोने परत करताना जिन्नसाच्या बँकेकडील नोंदीनुसार त्याला परत करायचे आहे. यामध्ये काही कमी आढळले तर बँकेने ते संबधित कर्जदाराला भरपाई करून द्यायचे आहे. विशेष म्हणजे बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्यांनीच जिन्नस हाताळायच्या आहेत.

एक किलोपर्यंतच्या दागिन्यांवर कर्जदागिने तारण कर्ज देताना एक किलोपर्यंत दागिन्यांवरच कर्ज द्यायचे. त्याचबरोबर नाणी असतील तर पाच तोळ्यांपर्यंत आता द्यावे लागणार आहे.

अंतर्गत लेखापरीक्षकांवर जबाबदारीबँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षकांवरही तारण जिन्नस तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी अचानक तपासणी करून त्याची नोंदीप्रमाणे खातरजमा करण्याच्या सूचना त्यांना आहेत.

सोने तारणावर कर्ज देण्याचे प्रमाण..

  • व्याजासह अडीच लाख : सोन्याच्या मूल्यांकनाच्या ८५ टक्के
  • व्याजासह अडीच ते पाच लाख : मूल्यांकनाच्या ८० टक्के
  • पाच लाखाच्या वर : मूल्यांकनाच्या ७५ टक्के

तारणाची सोपी प्रक्रियासोनेतारण कर्जास सरासरी ७ ते १० टक्के व्याज दर असतो. वर्षात परतफेड करण्याची मुदत असते. सहज उपलब्ध होते आणि दागिन्याच्या किमतीच्या बाजारभावानुसार ८० टक्क्यापर्यंतची रक्कम कर्ज म्हणून मिळते म्हणून त्याकडे ओढा वाढला आहे. परंतु त्यामुळेच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. बँकेच्या सराफालाच हाताशी धरून कर्ज उचलण्याचे प्रकार सुरू झाल्याने रिझर्व्ह बँकेने त्याला चाप लावला आहे.

रिझर्व्ह बँकेचे नवीन निकष चांगले असून, त्याचे पालन बँकांनी केले पाहिजे. कर्मचारी त्याचे पालन करणार की नाही, यावर बँक व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. - अनिल नागराळे (बँकिंग तज्ज्ञ