शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

आरक्षण आर्थिक निकषावर, गरजेनुसार द्यावे

By admin | Updated: March 25, 2017 17:47 IST

‘लोकमंच आरक्षण पुनर्विचार परिषदेती’ल सूर

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : जाती-जातींमध्ये मतभेद निर्माण करून आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार आरक्षण द्यावे, अशा मागणीचा सूर शनिवारी लोकमंच आरक्षण पुनर्विचार परिषदेत उमटला.

येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये ‘लोकमंच आरक्षण पुनर्विचार परिषद’ झाली. परिषदेस भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रमुख व राष्ट्रीय दलित नेते शांत प्रकाश जाटव (गाजियाबाद, उत्तर प्रदेश) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ते म्हणाले, आरक्षण पद्धती ही इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. त्यामुळे कला, शिक्षण, आदी व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. जाती-जातींवर आधारित जनगणना करण्याची पद्धत इंग्रजांनी सुरू केली. त्यामुळे जाती-जाती दुभंगत आहेत. पूर्वीपासून सुरू असलेली ही आरक्षण पद्धत बदलली पाहिजे. समाजातील ज्या घटकाला आरक्षण मिळालेले नाही, त्यांना प्रथम आरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे. गरजूंना आरक्षणाची आज गरज असल्याने त्यांना आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी भारतीय संविधान कलम ३४० नुसार आयोग स्थापित करावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घराघरांतून विनंतीची पत्रे गेली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली.

भारतीय आरक्षण मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोककुमार पांडे म्हणाले, आरक्षण पद्धतीमुळे जाती-जातीत दरी निर्माण होत आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षणाची पद्धत अंमलात यावी. राष्ट्रीय आझाद मंचच्या राष्ट्रीय महासचिव स्वागतिका पती म्हणाल्या, जातीच्या आधारावर आरक्षणे दिल्यामुळे समाज एकत्र येण्याऐवजी दुभंगला आहे. त्यासाठी प्रचलित आरक्षण पद्धती बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी न करता त्यावर विश्लेषण व समिक्षा झाल्या पाहिजेत.

यावेळी मधुकर पाटील म्हणाले, सध्याच्या आरक्षण पद्धतीवर विचारमंथन होण्याची गरज आहे. आरक्षणामुळे वंचित होते ते प्रवाहात आले; पण त्यातूनही आरक्षण न मिळाल्याने विशिष्ट समाज मागे राहिला आहे. मराठा समाजातही शेतीची विभागणी होत गेल्यामुळे तोही सध्याच्या स्थितीत मागासलेला बनत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

प्रारंभी परिषदेचे संयोजक सुनील मोदी यांनी परिषद घेण्याचा उद्देश विषद केला. ते म्हणाले, आमच्या परिषदेतून आरक्षण रद्द करावे, अशी मागणी नसून, आरक्षण दिलेल्यांपैकी वंचितांना आरक्षण द्या, अशी मागणी आहे. महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यांना आरक्षण देण्यासाठी आरक्षण व्यवस्था पाहावी लागेल. उर्वरित पन्नास टक्क्यांमधनू सामाजिक आणि आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे. यावेळी क्षिप्रा चक्रवर्ती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सनी भाले हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी) परिसरात पोलिस बंदोबस्त गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या आरक्षणाच्या नियोजनानंतर ही परिषद वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. कोल्हापुरातील बारा बलुतेदार संघटना एकत्र येऊन त्यांनी आरक्षण सघर्ष समितीच्या नावाखाली या परिषदेस विरोध दर्शविला होता. ही परिषद उधळून लावण्याचा इशारा दिला होता; पण परिषदेतील काही मागण्या शिथिल केल्याने परिषदेस पोलिसांनी परवानगी दिली होती; पण तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळी केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.