शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आरक्षण आर्थिक निकषावर, गरजेनुसार द्यावे

By admin | Updated: March 25, 2017 17:47 IST

‘लोकमंच आरक्षण पुनर्विचार परिषदेती’ल सूर

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : जाती-जातींमध्ये मतभेद निर्माण करून आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार आरक्षण द्यावे, अशा मागणीचा सूर शनिवारी लोकमंच आरक्षण पुनर्विचार परिषदेत उमटला.

येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये ‘लोकमंच आरक्षण पुनर्विचार परिषद’ झाली. परिषदेस भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रमुख व राष्ट्रीय दलित नेते शांत प्रकाश जाटव (गाजियाबाद, उत्तर प्रदेश) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ते म्हणाले, आरक्षण पद्धती ही इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. त्यामुळे कला, शिक्षण, आदी व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. जाती-जातींवर आधारित जनगणना करण्याची पद्धत इंग्रजांनी सुरू केली. त्यामुळे जाती-जाती दुभंगत आहेत. पूर्वीपासून सुरू असलेली ही आरक्षण पद्धत बदलली पाहिजे. समाजातील ज्या घटकाला आरक्षण मिळालेले नाही, त्यांना प्रथम आरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे. गरजूंना आरक्षणाची आज गरज असल्याने त्यांना आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी भारतीय संविधान कलम ३४० नुसार आयोग स्थापित करावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घराघरांतून विनंतीची पत्रे गेली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली.

भारतीय आरक्षण मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अलोककुमार पांडे म्हणाले, आरक्षण पद्धतीमुळे जाती-जातीत दरी निर्माण होत आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षणाची पद्धत अंमलात यावी. राष्ट्रीय आझाद मंचच्या राष्ट्रीय महासचिव स्वागतिका पती म्हणाल्या, जातीच्या आधारावर आरक्षणे दिल्यामुळे समाज एकत्र येण्याऐवजी दुभंगला आहे. त्यासाठी प्रचलित आरक्षण पद्धती बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी न करता त्यावर विश्लेषण व समिक्षा झाल्या पाहिजेत.

यावेळी मधुकर पाटील म्हणाले, सध्याच्या आरक्षण पद्धतीवर विचारमंथन होण्याची गरज आहे. आरक्षणामुळे वंचित होते ते प्रवाहात आले; पण त्यातूनही आरक्षण न मिळाल्याने विशिष्ट समाज मागे राहिला आहे. मराठा समाजातही शेतीची विभागणी होत गेल्यामुळे तोही सध्याच्या स्थितीत मागासलेला बनत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

प्रारंभी परिषदेचे संयोजक सुनील मोदी यांनी परिषद घेण्याचा उद्देश विषद केला. ते म्हणाले, आमच्या परिषदेतून आरक्षण रद्द करावे, अशी मागणी नसून, आरक्षण दिलेल्यांपैकी वंचितांना आरक्षण द्या, अशी मागणी आहे. महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यांना आरक्षण देण्यासाठी आरक्षण व्यवस्था पाहावी लागेल. उर्वरित पन्नास टक्क्यांमधनू सामाजिक आणि आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे. यावेळी क्षिप्रा चक्रवर्ती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सनी भाले हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी) परिसरात पोलिस बंदोबस्त गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या आरक्षणाच्या नियोजनानंतर ही परिषद वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. कोल्हापुरातील बारा बलुतेदार संघटना एकत्र येऊन त्यांनी आरक्षण सघर्ष समितीच्या नावाखाली या परिषदेस विरोध दर्शविला होता. ही परिषद उधळून लावण्याचा इशारा दिला होता; पण परिषदेतील काही मागण्या शिथिल केल्याने परिषदेस पोलिसांनी परवानगी दिली होती; पण तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळी केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.