शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

महालक्ष्मी एक्सप्रेसचे आरक्षण आजपासून सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे मध्य रेल्वेची कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या दहा महिन्यांपासून बंद होती. आता ही ...

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे मध्य रेल्वेची कोल्हापूर ते मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या दहा महिन्यांपासून बंद होती. आता ही गाडी १ फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरु होणार आहे. या गाडीचे आरक्षण आज, रविवार (दि. २४)पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सुत्रांनी दिली.

कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि व्यापारी, सर्वसामान्यांना परवडणारी गाडी म्हणून महालक्ष्मी एक्सप्रेसकडे पाहिले जाते. कोरोना महामारीत कोल्हापुरातून मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, बंगलोर, आदी ठिकाणी सुटणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी कोयना ही कोल्हापूर ते मुंबई आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरु केली. त्यानंतर आता १ फेब्रुवारीपासून महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे रुळावर येणार आहेत. याबाबतची घोषणा शनिवारी रात्री मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार या रेल्वे गाडीची अधिसूचना कोल्हापूर रेल्वे स्थानकाला प्राप्त झाली असून, आज (रविवार)पासून या रेल्वेचे आरक्षण सुरु होणार आहे. या गाडीने आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सुत्रांनी दिली.