शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे आरक्षण रद्द

By admin | Updated: January 9, 2015 00:10 IST

उच्च न्यायालयाचा निकाल : कुरुंदवाड पोलीस ठाण्यासाठी भूसंपादन रखडल्याचा परिणाम

कुरुंदवाड : शहरातील १९८५ च्या विकास आराखड्यातील पोलीस वसाहत व ठाण्याच्या आरक्षणाची जागा मुदतीत संपादन न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित जमीन मूळ मालकास परत देण्याचा आदेश दिला. न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती मेनन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. जमीनमालक संजय उपाध्ये यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहिले.शहराचा विकास आराखडा १९८५ ला शासनाने मंजूर केला. त्यामध्ये दत्त महाविद्यालयालगत संजय उपाध्ये व त्यांचे इतर बंधंूच्या मालकीच्या १०३ गुंठ्यांवर पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीचे आरक्षण टाकले होते. या आरक्षणाला २७ वर्षे झाली तरी संबंधित विभागाने भूसंपादनाची कोणतीही कार्यवाही केली नाही. महाराष्ट्र नगररचना अधिनियमातील कलम १२७ चे तरतुदीप्रमाणे एक वर्षात भूसंपादन करावे व न केल्यास आरक्षण रद्द होईल, अशी नोटीस जमीन मालकाने दिली होती. मात्र, कोणतीही कार्यवाही न झाल्याने आरक्षण रद्द व्हावे, अशी याचिका उपाध्ये यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यापैकी अभयकुमार व देवेंद्र उपाध्ये यांच्या जमिनीवरील आरक्षण २०१२ मध्ये रद्द झाल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता; मात्र संजय उपाध्ये यांच्या मालकीच्या जागेवरील आरक्षणाबाबत निर्णय झाला नव्हता.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहर विकास आराखडा मंजूर झाल्यापासून दहा वर्षांचे आत जर भूसंपादन झाले नाही, तर जमीन मालक संबंधित प्राधिकरणाला नोटीस देऊन भूसंपादन करण्याची विनंती करू शकतो. अशी विनंती केल्यापासून जर संबंधित प्राधिकरणाने एक वर्षात भूसंपादनाची अधिसूचना जारी केली नाही तर आरक्षण रद्द होते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुतार यांनी न्यायालयासमोर मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती ओक व मेनन यांनी पोलीस वसाहत व पोलीस ठाण्यासाठी आरक्षण रद्द करीत याचिकाकर्त्यांना जमीन विकसन करण्यास परवानगी दिली. (वार्ताहर)उपाध्ये बंधूंना दिलासाउपाध्ये बंधूंच्या एकूण जमिनीपैकी सर्वच जमिनीवर औद्योगिक वसाहत, सार्वजनिक रस्ता व पोलीस खात्यासाठी असलेली पोलीस वसाहत, पोलीस ठाण्याचे आरक्षण होते. त्यापैकी औद्योगिक वसाहत व रिंगरोडसाठीचे आरक्षण हे तुटपुंज्या रकमेत संपादित झाले होते. त्यापैकी उर्वरित अडीच एकरांचा तुकडाच काय तो उपाध्ये कुटुंबीयांकडे उरला होता. तो जर गेला असता तर कुटुंब भूमिहीन झाले असते; मात्र या निर्णयाने उपाध्ये कुटुंबीयांना दिलासा मिळाला.