शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महापुरात तग धरणाऱ्या पिकांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST

* प्रयोगशाळा उभारली जाणार संदीप बावचे शिरोळ : अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीपुढील अनेक पर्याय पुढे येऊ लागले आहेत. वारंवार ...

* प्रयोगशाळा उभारली जाणार

संदीप बावचे

शिरोळ : अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीपुढील अनेक पर्याय पुढे येऊ लागले आहेत. वारंवार महापूर येत असेल तर नदीबुड क्षेत्रात पर्यायी पीक कोणते करता येईल, शिवाय तग धरणाऱ्या नव्या ऊस पिकाचे बियाणे तयार करून आगामी काळात जर महापूर परिस्थिती निर्माण झाली तर त्या महापूर स्थितीतही ऊस पीक चांगले राहण्यासाठी काय करता येईल, यासाठी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

गेल्या अठरा वर्षांत चार वेळा महापुराने शिरोळ तालुक्यातील पिकांची मोठी हानी केली. न भरून येणारे नुकसान झाल्याने शेतकरी पुरता अस्वस्थ झाला. ऊस, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. महापुरामुळे जमिनीतील जीवाणू मरून गेले आहेत. त्याचे पुन्हा संवर्धन करणे शिवाय पीकवाढीवर होणारे परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहेत. वारंवार येणाऱ्या महापुरामुळे नदीबुड क्षेत्रातील पिकाला पर्यायी पीक कोणते करता येईल, यासाठी ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. दत्तच्या माध्यमातून वेगळा प्रयोग राबविला जाणार आहे. यासाठी तालुक्यातील काही भागांची पाहणी करण्यात आली. महापुरामुळे ऊस पिकाचेच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, ही बाब पुढे आली आहे. दहा ते पंधरा दिवस उसात महापुराचे पाणी राहिले तर त्यातूनही उत्पन्न कसे घेता येईल, यावर संशोधन केले जाणार आहे. पाहणी दरम्यान, आंबा, पेरू, चिकू ही झाडे पुराच्या पाण्यात चांगली राहिल्याचे दिसून आले आहे. यावर संशोधन करण्यासाठी मोठी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. दत्तकडून जीवाणू देखील तयार करून कमी दरामध्ये ते शेतकऱ्यांना देण्यासाठी देखील नियोजन केले जाणार आहे. यासाठी शास्त्रज्ञ व संशोधक यांची मदत घेतली जाणार आहे.

--------------

कोट -

शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. महापुरात जमीन आणि पीक बुडाले तरी ऊस आणि फळपीक घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- गणपतराव पाटील, अध्यक्ष दत्त कारखाना

फोटो - १२०९२०२१-जेएवाय-०४-गणपतराव पाटील