शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऊसतोडणी दरवाढ समितीवर प्रतिनिधित्व द्या

By admin | Updated: February 13, 2015 23:48 IST

ऊसतोड दरप्रश्न : वाहतूक संघटना व कृषी अधिकाऱ्यांची मागणी

सतीश पाटील- शिरोली -ऊसतोड मजूर मुकादमांकडून राज्यातील ऊस वाहतूकदार मालकांची २०० कोटींची फसवणूक झाली आहे. म्हणूनच ऊसतोडणी दरवाढीच्या राज्य शासनाच्या समितीवर ऊस वाहतूकदार व कारखान्यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी वाहतूक संघटना व कृषी अधिकारी यांनी केली आहे.राज्यात चालू वर्षी सहकारी आणि खासगी असे १७१ साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना ऊस पुरविण्यासाठी सुमारे ३९ हजार वाहतूकदार आहेत. या वाहतूकदारांनी ऊस तोडण्यासाठी टोळींना पाच लाखांपासून आठ लाखांपर्यंतची रक्कम अ‍ॅडव्हान्स रूपात दिली आहे. राज्यातील वाहतूकदारांनी चालूवर्षी चार हजार कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स रूपात वाटले आहेत; पण पाच ते आठ लाख रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊन अनेक ऊसतोड मजुरांनी व मुकादमांनी पोबारा केला आहे. त्यातून वाहनचालकांना २०० कोटींना गंडा घातला गेला. कोल्हापुरातील सुमारे १६० वाहनचालकांना नऊ कोटींना फसविले आहे. हे मजूर पैसे घेतात; पण प्रत्यक्ष ऊसतोडणीसाठी येतच नाहीत. त्यामुळे दरवर्षी वाहतूकदारांनाच हा लाखो रुपयांचा फटका बसतो आहे. हे बुडालेले पैसे वाहतूकदाराला शासनही देत नाही आणि साखर कारखानाही देत नाही. वाहतूकदारांनी सावकार, बँका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज स्वरूपात पैसे काढलेले आहेत. हे पैसे बुडाल्याने वाहतूकदार आत्महत्या करू लागले आहेत. म्हणूनच या गोष्टीला आळा बसण्यासाठी तोडणी दरवाढीच्या राज्य शासनाच्या समितीमध्ये वाहतूकदार प्रतिनिधी आणि तांत्रिक सल्लागार म्हणून साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यांचा समावेश प्रतिनिधी म्हणून करून घ्यावा, अशी वाहतूकदार संघटनेची मागणी आहे. याबाबतचे निवेदनही सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांना दिले आहे.ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्याकडून वाहतूकदारांची फसवणूक होत अहे. ही फसवणूक थांबविण्यासाठी आणि या प्रकाराला आळा बसण्यासाठी वाहतूकदार प्रतिनिधी अणि कारखान्याचा कृषी अधिकारी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून घ्यावे.- सुधाकर पाटील, कृषी अधिकारी,शरद साखर कारखाना, नरंदे.मुंबईत १६ रोजी बैठकऊस तोडणी मजुरांची दराबाबत मुंबईत १६ फेब्रुवारीला बैठक होत आहे. यावेळी या ऊसतोडणी दरवाढीच्या राज्य शासनाच्या समितीमध्ये वाहतूकदार संघटनेचा प्रतिनिधी व कृषी अधिकारी यांचा समावेश करून घ्यावा, अशी वाहतूक संघटनेची मागणी आहे.