शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

हद्दवाढीचा अहवाल ‘नगरविकास’कडे सादर

By admin | Updated: July 22, 2016 00:50 IST

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष : समितीने केली होती पाहणी

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहराच्या हद्दवाढीसंदर्भात गुरुवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे सविस्तर अहवाल सादर केला. दि. ८ जूनला कोल्हापुरात आलेल्या द्विसदस्यीय समितीसमोर हद्दवाढ विरोधक व समर्थकांनी मांडलेल्या बाजूसह जिल्हा व महानगरपालिका प्रशासनालाही त्यांची बाजू सविस्तर अहवालाद्वारे सादर करण्याची सूचना या समितीने केली होती. त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी गुरुवारी मंत्रालयात समितीचे सदस्य तथा उपसचिव अनीष परशुरामे व राजेंद्र कौरते यांच्याकडे हा अहवाल दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार द्विसदस्यीय समितीने कोल्हापुरात दि. ८ व ९ जूनला प्रस्तावित हद्दवाढीतील गावांची पाहणी केली होती. तसेच हद्दवाढविरोधी तसेच हद्दवाढ समर्थकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. दोन्ही दिवस झालेल्या चर्चेचे प्रोसिडिंग करून घेण्याची जबाबदारी महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. संपूर्ण प्रोसिडिंग तयार झाल्यानंतर त्याचा अहवाल तसेच चर्चेवेळी हद्दवाढ विरोधी समितीने ज्या शंका उपस्थित केल्या होत्या, त्याबद्दल महानगरपालिकेने कोणत्या प्रकारे उपाययोजना केल्या आहेत, खर्चाची तरतूद काय करण्यात आली आहे, याबाबतचे म्हणणे या अहवालासोबत देण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या सर्व शंका दूर करणारे म्हणणे अहवालासोबत गुरुवारी सरकारला सादर केले. शहराच्या हद्दवाढीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेणार आहेत. त्यामुळे हा अहवाल परिपूर्ण असला पाहिजे, असा द्विसदस्यीय समितीचा आग्रह आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालातील काही त्रुटींवर सुद्धा माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडे हा अहवाल जाण्यास आणखी काही दिवस जाणार आहेत. तथापि, सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे परिपूर्ण अहवाल तयार करण्याचे काम मंत्रालय पातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या अहवालावर केव्हा आणि कशा प्रकारे निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)\कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणे आता अपरिहार्य बनले आहे. शहराचा विकास करण्यासाठी हद्दवाढ आवश्यकच आहे. राज्य सरकारने सोमवारपर्यंत हद्दवाढीचा निर्णय घेतला नाही, तर मंगळवारपासून विधानभवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे. - राजेश क्षीरसागर, आमदार