शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘सारथी’च्या रचनेबाबतचा अहवाल डिसेंबरअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:06 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) रचनेबाबतचा अहवाल डिसेंबर २०१७ अखेर सादर करण्यात येणार आहे. याबाबत कृषी, उद्योग, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) रचनेबाबतचा अहवाल डिसेंबर २०१७ अखेर सादर करण्यात येणार आहे. याबाबत कृषी, उद्योग, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती हा अहवाल सादर करणार आहे.महाराष्ट्रामध्ये गतवर्षी मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले होते. त्याची दखल घेत मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या युवक-युवतींसाठी एका संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे जाहीर केला होता. ‘बार्टी’संस्थेच्या माध्यमातून दलित युवक, युवती, विद्यार्थी यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याच धर्तीवर ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.त्यानंतरदि. ३ जानेवारी २०१७ रोजी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आदेश काढून या संस्थेचे स्वरूप कसे असावे, याबाबत मार्गदर्शन व शिफारस करण्यासाठी द्विसदस्यीय समितीची स्थापना केली होती. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे यांची समितीच्या अध्यक्षपदी, तर डी. आर. परिहार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सेनापती बापट रोडवरील ‘बालचित्रवाणी’चे कार्यालय या संस्थेसाठी देण्यात आले आहे. या समितीला आॅक्टोबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ती पुन्हा वाढवण्यात आली असून डिसेंबरअखेर करण्यात आली आहे. त्यानुसार बहुजन समाजाचे कृषी, शिक्षण, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक असे जे प्रश्न आहेत, त्यांचा सर्वंकष अभ्यास करून ते सोडविण्यासाठी ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून काय करता येईलयाबाबत ही समिती शिफारशी करणार आहे.