शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

‘वारणा’ योजनेसाठी फेरनिविदा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:32 IST

शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वारणा नळ योजनेच्या निविदेमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत. तरी योजनेसंदर्भात फेरनिविदा मागविण्याचे निर्देश करणारे पत्र महाराष्टÑ जीवन प्राधिकरणने इचलकरंजी नगरपालिकेस पाठविले आहे

ठळक मुद्दे जीवन प्राधिकरणचे निर्देश : इचलकरंजीची योजना

इचलकरंजी : शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वारणा नळ योजनेच्या निविदेमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आहेत. तरी योजनेसंदर्भात फेरनिविदा मागविण्याचे निर्देश करणारे पत्र महाराष्टÑ जीवन प्राधिकरणने इचलकरंजी नगरपालिकेस पाठविले आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे रेंगाळलेल्या वारणा योजनेच्या पूर्णत्वाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका राष्टय कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये केली.

वारणा नळ योजना गेली तीन वर्षे रेंगाळली असल्याचे सांगून नगरसेवक बावचकर म्हणाले, ७०.३० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेस सन २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचे काम रखडले. ३१ मे २०१८ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दानोळी (ता. शिरोळ) ऐवजी कोथळी येथून पाणी आणण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, तेथूनही विरोध सुरू झाल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी भाजप आघाडीने पुन्हा ‘यु टर्न’ घेतला आणि दानोळी येथूनच पाणी उचलण्यात यावे, असा प्रस्ताव २५ फेब्रुवारी २०१९ ला मंजूर केला.

योजनेसंदर्भात आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची

मार्चला भेट घेतली.त्यावेळी दानोळी येथून नळ योजना राबविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र पालिकेतील विरोधी पक्षाला अंधारात ठेवले होते. ८ मार्चला निविदा मागविल्या. त्यानंतर निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने दोनवेळा मुदतवाढ घेतली. अखेर २७ मे रोजी पुणे येथील एच. सी. कटारिया यांची निविदा उघडली.

या निविदेबाबत जीवन प्राधिकरणचे मार्गदर्शन मागविले असता निविदेतील अनेक त्रुटींवर प्राधिकरणने बोट ठेवले. वारणा योजनेसाठी ग्रामस्थांचा विरोध, योजनेच्या जागेबाबत निर्माण झालेला प्रश्न यांचा कोणत्याही प्रकारचा ऊहापोह नगरपालिकेने केला नाही. दोनवेळा मुदतवाढ देऊन एकच निविदा प्राप्त झाली. दोनवेळा मुदतवाढ प्राप्त न होण्याचे कारण काय, तसेच कटारिया यांच्या तांत्रिक क्षमतेबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण पालिकेकडून करण्यात आले नाही. अशा प्रकारच्या काही त्रुटी आढळून आल्यामुळे फेरनिविदा काढण्याचे निर्देश प्राधिकरणने नगरपालिकेला दिले. आता आणखीन किती दिवस ही योजना रेंगाळणार आहे, असाही प्रश्न नगरसेवक बावचकर यांनी उपस्थित केला आहे.राजकीय पोळी भाजण्यात अधिक रसनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शहरातील पाणीप्रश्नाचे भांडवल करून मताचा जोगवा मागितला आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाणीप्रश्नापेक्षा त्यावर राजकीय पोळी भाजण्यातच सत्ताधारी मंडळींना अधिक रस आहे, अशी टीका करून नगरसेवक बावचकर पुढे म्हणाले, आता निवडणुका होऊन दोन महिने झाले तरी वारणेच्या प्रश्नावर कोणीही बोलत नाहीत.

अनावश्यक खर्च नगराध्यक्षांकडून वसूल करावानळाला पाच दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने नागरिकांचे मात्र पाण्यावाचून हाल होत आहेत. इकडे मात्र वारणेच्या निविदा प्रक्रियेवर अनावश्यक खर्च होत आहे. हा खर्च नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडून वसूल करावा, अशीही मागणी कॉँग्रेसने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका