शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

त्रुटी दूर करा, मगच आराखड्याचा अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:53 IST

अंबाबाई मंदिर विकास : थेट पाईपलाईनसारखी स्थिती होऊ नये यासाठी नगरसेवकांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सर्वसमावेशक असावा. कामांच्या त्रुटी प्रारंभापूर्वीच दूर कराव्यात, महाद्वारमधून भाविकांना प्रवेशबंदी नको, शिवाजी मार्केटची इमारत विकसित करून त्यामध्ये भाविकांच्या वाहनतळाची सोय करावी, आदी सूचना मंगळवारी नगरसेवक व नागरिकांनी मांडल्या. सुमारे ६८.७ कोटी रुपये खर्चाच्या श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची माहिती महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांना व्हावी, यासाठी महापौर हसिना फरास यांनी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आराखड्याच्या सादरीकरणाचे आयोजन केले होते. यावेळी महापौर फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, आदी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यावर सुचविलेल्या सूचना, दुरुस्त्या बदलांचा अंतर्भाव केलेला पहिल्या टप्प्यातील आराखडा आता ९२ कोटींवर गेला आहे. मंदिराच्या चारही दरवाजांच्या आतील परिसराचे जतन, संवर्धन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीने यंदाच्या अंदाजपत्रकात सात कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ही रक्कम महापालिकेच्या विकास आराखड्यातून वगळण्यात आली आहे. हेरिटेज कॉन्झर्व्हेशनची रक्कमदेखील या प्रस्तावातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे शासनदरबारी पहिल्या टप्प्यातील ६८ कोटी ७ लाखांचा आराखडा पाठविण्यात आला आहे. या आराखड्याचे शासनाच्या नगरविकास खात्याकडे शुक्रवारी (दि. ९) सादरीकरण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरसेवकांच्या माहितीसाठी हे सादरीकरण करण्यात आले. या आराखड्याचे सादरीकरण ‘फोरट्रेस’ या सल्लागार कंपनीचे महेंद्र कर्णे यांनी केले. या आराखड्यात शहरातील बिंदू चौक, सरस्वती चित्रमंदिर या दोन ठिकाणी तीनमजली वाहनतळ इमारत तर व्हीनस कॉर्नर येथे भक्त निवास आणि वाहनतळासाठी तीनमजली इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. आराखडा सादरीकरणानंतर अजित ठाणेकर यांनी, आराखडा मंजूर करताना घाईगडबड करू नका, अंबाबाई मंदिर हे पुरातन असल्याने विकासकामे करताना पुरातत्त्व खात्याची परिसरात बांधकामे करता येणार नाहीत, अशी अधिसूचना निघाल्यास पंचाईत होईल; त्यामुळे आराखड्यात बदल करण्यासाठी नियमांची तरतूद करावी, अशा सूचना मांडल्या. व्हीनस कॉर्नर भागात भक्तनिवास व वाहनतळ उभारल्याने परिसरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढणार असल्याची सूचना शेखर कुसाळे यांनी मांडली. अंबाबाई पालखी मार्गाचाही विकास करावा, अशी सूचना किरण नकाते यांनी मांडली. शिवाजी मार्केट विकसित करून ते वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना मा. बनछोडे यांनी मांडली. यावेळी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, तसेच नागरिकांनी सूचना मांडल्या. स्थानिक भक्तांची खास सोय असावीजयश्री चव्हाण यांनी, रोज दर्शनासाठी सकाळी येणाऱ्या स्थानिक भक्तांचाही विचार करून त्यांच्यासाठी दर्शनाची खास सोय करावी अशी सूचना मांडली. बहुतांश भक्त हे महाद्वार रोडमार्गे येतात; त्यामुळे महाद्वारातून प्रवेशबंदी नसावी अशीही सूचना त्यांनी मांडली.आराखडा कागदावरच नकोआराखडा हा सर्वसमावेशक, लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश असलेला असावा, अशी सूचना भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी मांडल्या. व्हीनस कॉर्नरची इमारत ही भक्त निवास आणि वाहनतळ अशी स्वतंत्र असावी, नगारखाना इमारत, श्री तुळजाभवानी मंदिर, याचाही विकास करावा, अशाही सूचना मांडल्या.सर्व सूचनांचा विचार करू : आयुक्तमंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आवश्यकतेनुसार बदल करू. सर्वांच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करून सर्वसामावेशक आराखडा प्रत्यक्षात राबवू, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले. थेट पाईपलाईनसारखी अवस्था नकोथेट पाईपलाईनच्या कामाबाबत जे झाले ते अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्याबाबत होऊ नये त्यासाठी सर्व परवानग्या घेऊन काम सुरू करावे. पुरातत्त्व विभागाच्या अडचणी उद्भवणार असल्याने त्याचा प्राधान्याने विचार करावा, अशा सूचना सभागृह नेते प्रवीण केसरकर, भूपाल शेटे, आदिल फरास यांनी मांडल्या. निधीला कात्रीया आराखड्याला मूर्त स्वरूप येण्याअगोदरच पहिल्या टप्प्यातील निधीला कात्री लावली. सुमारे २५५ कोटींच्या या आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी ७२ कोटी प्रस्तावित केले होते; तर त्यामध्ये महापालिकेने मंदिर संवर्धनासाठीच्या तरतुदीत वाढ करून तो खर्चाचा टप्पा ९० कोटींपर्यंत नेला; पण ही तरतूद राज्य शासनाने फेटाळली; त्यामुळे त्यासाठी ६८ कोटींच्या कामांना मान्यता मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.पहिला टप्पा..कोल्हापूर महानगरपालिकेकडून २५५ कोटींचा प्रारूप विकास आराखडा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार तीन टप्प्यांत करण्यात आला होता. पुणे विभागीय आयुक्त यांनी प्रथम प्राधान्याने करावयाच्या टप्पा क्रमांक १ च्या अंदाजपत्रकीय ६८ कोटी ७ लाखांच्या कामांना मान्यता होण्यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला आहे. यामध्ये दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन मंडप, उड्डाणपूल, रस्ते सुविधा, वाहनतळ, भक्तनिवास, सुशोभीकरण यांचा समाावेश आहे.भाविकांना प्रवेशमंदिरात भाविकांना दर्शन मंडपातून पूर्वेच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश मिळेल, तर देवीच्या मुखदर्शनसाठी मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारातून आत जाता येईल. तेथून भक्तांच्या दर्शनवे ब्रिजखालून पुढे मुखदर्शन घेता येईल. याशिवाय दर्शन घेतलेले भाविक पश्चिमेच्या महाद्वारातून महाद्वार रोडकडे बाहेर पडतील.बिंदू चौक उपकारागृह स्थलांतरित करावेआराखडा प्रत्यक्षात उतरविताना बिंदू चौक उपकारागृहामुळे कारागृहाचे नियम आडवे येणार आहेत. येथे वाहनतळाची इमारत बांधताना नियमावलीचा फटका बसण्याची शक्यता आहे; त्यामुळे हे उपकारागृह कळंबा कारागृहाच्या पिछाडीस महापालिकेच्या जागेत स्थलांतरित करावे, अशी सूचना गणी अजरेकर, विजय सूर्यवंशी, आदिल फरास आदींनी मांडली. कामावर लक्ष ठेवण्यासाठी समितीया विकास आराखड्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व गटनेते व ज्येष्ठ नगरसेवकांची समिती नेमून कामावर लक्ष ठेवून प्रत्यक्षात जाग्यावर होणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना महापौर हसिना फरास यांनी मांडली.असा असेल आराखडाबिंदू चौक, सरस्वती चित्रमंदिरानजीक तीनमजली वाहनतळ इमारत, व्हीनस कॉर्नर चौकात भक्त निवास आणि वाहनतळाची एकत्रित तीनमजली इमारतभक्तांना पूर्वेकडून दर्शनमंडपातून थेट मंदिरात प्रवेश, मुखदर्शनासाठी दक्षिण प्रवेशद्वारातून प्रवेश; तर पश्चिमेकडील महाद्वारमधून भक्त बाहेर पडतील.बिंदू चौक ते भवानी मंडप (जेल मार्ग) हा मार्ग वाहतुकीसाठी बंदअंबाबाई मंदिर परिसरातील सर्व वायरिंंग, गटर्स भूमिगत होणारमहोत्सवावेळी दर्शनास येणाऱ्या सुमारे सव्वा कोटी भाविकांचा विचार करून आराखडा