शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

उर्वरित आयुष्य धनगर आरक्षणासाठी खर्ची: गणपतराव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:38 IST

कोल्हापूर : आता जेवढं काही आयुष्य उरलेलं आहे, ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असल्याचे भावपूर्ण उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी येथे काढले. यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजित महोत्सवामध्ये देशमुख यांचा ‘यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला; त्यावेळी ते बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी दुपारी धनगर समाजातील आदर्श ...

कोल्हापूर : आता जेवढं काही आयुष्य उरलेलं आहे, ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असल्याचे भावपूर्ण उद्गार आमदार गणपतराव देशमुख यांनी येथे काढले. यशवंत युवा सेनेच्या वतीने आयोजित महोत्सवामध्ये देशमुख यांचा ‘यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला; त्यावेळी ते बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी दुपारी धनगर समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि धनगरी लोकसंस्कृती सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या हस्ते देशमुख यांचा सन्मानचिन्ह, शाल, घोंगडे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.देशमुख म्हणाले, आमच्या समाजाचे अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रश्न आहेत. हा समाज मागास आहे. जे शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे या समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही; म्हणूनच या प्रश्नासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालणार आहे.यशवंत युवा सेनेचे अध्यक्ष विवेक कोकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. बाबूराव हजारे, सहायक पोलीस निरीक्षक जानकर, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा काळबाग, डॉ. दीपक शेंडगे, सुधाकर बदरणे यांच्यासह धनगर समाजातील कर्तबगारांचा सत्कार केला. अमरसिंहराजे बारगळ, भूषणसिंह होळकर, रेणुका शेंडगे, प्राचार्य शिवाजीराव दळणार, बबन रानगे, अशोक कोळेकर, कल्लाप्पा गावडे, सुलोचना नाईकवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.धनगरी ढोलांनी मुंबई घुमणारमाजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. आरक्षणासाठी म्हणून २0१४ साली आम्ही सरकार बदलण्यासाठी साथ दिली. मात्र सरकारने केवळ चर्चा करण्याशिवाय काहीही केले नाही. प्रत्येक बैठकीमध्ये आरक्षणाला मुद्दा जोरदारपणे मांडत होतो; पण आता मला बैठकीलाच बोलवायचे बंद केले आहे. मात्र आता आरक्षणासाठी मुंबईत असे काही ढोल बडवू की त्यांचा आवाज घुमेल आणि तो मंत्रालयापर्यंत जाईल, असा इशारा शेंडगे यांनी दिला. हे सरकार खाली खेचण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना याचा जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला.धनगरी संस्कृतीचे दर्शनरविवारी दुपारी शाहू स्मारक परिसरात धनगरी संस्कृतीचेच दर्शन घडले. उचगाव येथील मंगोबा ओवीकर मंडळाने सादर केलेल्या ओव्या, शाहीर डॉ. अमोल रणदिवे यांनी सादर केलेला अहिल्यादेवींचा पोवाडा, आटपाडी येथील बिरूदेव गजी मंडळ निंबवडे यांचे गजीनृत्य यांमुळे वातावरण जल्लोषी बनले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणांनी शाहू स्मारक भवन दुमदुमून गेले.