शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पूरग्रस्तांच्या मदतीत लवकरच वाढ करणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:20 IST

दोन हेक्टरपर्यंत कर्जमाफी देण्याचा विचार

यदु जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर, सांगलीसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतचे कृषी कर्ज व्याजासह माफ करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. याशिवाय ग्रामीण व शहरी भागात नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी १० हजार रुपयांचे तर पूर्णत: नुकसान झालेल्या घरांसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची बाबही विचाराधीन असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. एक लाख रुपयापर्यंत कर्ज असणाºया पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या कर्जावरील काही महिन्यांचे व्याज राज्य शासनाने भरावे याबाबतही विचार सुरू आहे, असे पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

प्रश्न : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने कुठल्या उपाययोजना केल्या?उत्तर : एक हेक्टरपर्यंतचे पीककर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच घेतला आहे. ज्या शेतकºयांनी कर्ज घेतलेलले नाही, त्यांना कोरडवाहू पिकांसाठी २०,४०० तर बागायती पिकांसाठी ४०,५०० रुपये आणि फळपिकांसाठी ५४ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्याचा निर्णय झाला. एक हेक्टरपर्यंतचे कर्ज माफ केल्याने ८२ टक्के शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. आता २ हेक्टरपर्यंत कर्जमाफी केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

प्रश्न : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा कमी पडली का?उत्तर : महापुराचा अंदाज सुरुवातीला संबंधित यंत्रणांना आणि नागरिकांनाही आला नाही. त्यामुळे यंत्रणेच्या तत्परतेबाबत शंका उपस्थित केली गेली, पण वस्तुस्थिती ही आहे की जितकी प्रचंड यंत्रणा मदतकार्यात उतरवण्यात आली आणि आर्थिक मदतीसह विविध प्रकारची मदत देण्यात आली, तेवढी भूतकाळात कधीही देण्यात आलेली नव्हती.

प्रश्न : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कुठल्या उपाययोजना केल्या?उत्तर : पूरग्रस्तांना दर महिन्याला १० किलो गहू आणि २० किलो तांदूळ चार महिन्यांसाठी मोफत देत आहोत. ज्यांची घरे पूर्णत: पडली त्यांना भाड्याच्या घरासाठी महिन्याला २ हजार याप्रमाणे २४ हजार, तर ग्रामीण भागात ३ हजार महिना याप्रमाणे ३६ हजार शहरी भागात घर बांधून होईपर्यंत देण्यात येत आहेत. आता त्यात वाढ करीत आहोत. घर बांधण्यासाठी शहरात पंतप्रधान आवास योजनेत अडीच लाखांची, तर मुख्यमंत्री निधीतून एक लाख अशी साडेतीन लाखांची मदत दिली जाईल. ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेतून दीड लाख आणि मुख्यमंत्री निधीतून एक लाख देण्यात येतील.

अंशत: नुकसान झालेल्या घरांसाठी काय मदत दिली?अर्धवट पडलेली घरे दुरुस्त करण्यासाठी २,४०० रुपये अनुदान आणि १२ हजार रुपये कर्ज तर पूर्णत: पडलेल्या घरांसाठी ४,८०० रुपयांचे अनुदान व १६ हजार कर्ज स्वरूपात देण्यात येत आहेत. आता अनुदान व कर्ज असे दोन भाग न करता सरसकट भरघोस अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरते सानुग्रह अनुदान म्हणून ग्रामीण भागात दहा हजार तर शहरी भागात पंधरा हजार देण्यात येत आहेत. महापुराच्या काळात जे लोक सरकारने उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये राहत होते त्यांना प्रति माणसी ६० रुपये आणि प्रति बालक ४५ रुपये बँक खात्यात टाकण्यात येईल. माल वाहून गेलेल्या लहान व्यापाºयांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा ५० हजार यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दिली जात आहे. तसेच या व्यापारावरील एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरचे व्याज पुढील सात महिने शासन भरेल.पूरपरिस्थिती रोखण्यासाठी काय उपाय योजणार?पुराचे किंवा जादाचे पाणी मराठवाड्यात वळते करण्यासाठीची एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेणार आहोत. त्यावर दहा हजार कोटी खर्च करण्यात येतील.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरchandrakant patilचंद्रकांत पाटील