शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

निवळीतील ‘त्या’ २९ कुटुंबांना जमिनी परत-मुरगूड पोलिसांचे सामंजस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:47 IST

दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : गलगले (ता. कागल) येथे वसविलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या जमिनीवर काही मूळ मालकांनी न्यायालयातून आदेश आणून ताबा मिळविला, तर काहीनी आदेश नसतानाही आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे या कुटुंबांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. अखेर प्रशासनासह मुरगूड पोलिसांच्या मदतीने न्यायालयाचा आदेश नसताना ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून २९ ...

ठळक मुद्दे४१ कुटुंबांना मात्र जमिनीची प्रतीक्षाच, १९९९ मध्ये चांदोली धरण क्षेत्रातील विस्थापित

दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : गलगले (ता. कागल) येथे वसविलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या जमिनीवर काही मूळ मालकांनी न्यायालयातून आदेश आणून ताबा मिळविला, तर काहीनी आदेश नसतानाही आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे या कुटुंबांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. अखेर प्रशासनासह मुरगूड पोलिसांच्या मदतीने न्यायालयाचा आदेश नसताना ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून २९ कुटुंबांना त्यांच्या जमिनी त्यांना परत केल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनी गेलेल्या २८ कुटुंबीयांसह अद्याप जमिनी न मिळालेले १३ कुटुंबे जमिनीच्या प्रतीक्षेतच आहेत.

१९९९ मध्ये चांदोली धरण क्षेत्रात अभयारण्य उभारण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतील सात गावे विस्थापित करण्यात आली. यामध्ये निवळीचाही समावेश होता. या गावातील काही कुटुंंबे किणी-वाठार येथे, तर ७० कुटुंबांचे पुनर्वसन कागल तालुक्यातील गलगले येथे झाले. प्रत्येक कुटुंबाला गावठाणात चार गुंठे जागा, तसेच उदरनिर्वाहासाठी शेतजमिनीही दिल्या. या जमिनी मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागला. २००७ पर्यंत टप्प्याटप्प्याने ५८ कुटुंबांना गलगलेसह खडकेवाडा, हमिदवाडा, मुगळी याठिकाणी जमिनीचे वाटप करण्यात आले. तर, अद्याप १३ कुटुंबांना जमिनी मिळालेल्याच नाहीत. यापैकी काहींनी पुनर्वसनास घेतलेल्या जमिनीबाबत न्यायालयात धाव घेतली. तर, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीवर ताबापट्टी घेतली. न्यायालयाच्या निकालाबाबत प्रशासनाकडून आदेश आल्यानंतर २८ कुटुंबीयांनी आपल्या जमिनी मूळ मालकांना परत केल्या. तर आम्हीही न्यायालयात जाऊन आदेश प्राप्त करू, असे सांगत आदेश नसतानाही हमिदवाडा, खडकेवाडा, मुगळी येथील शेतकºयांनी जमिनीवर ताबा मिळविला. त्यामुळे या विस्थापित कुटुंबांनी संघटनेसह प्रशासनाकडे धाव घेतली होती.४१ कुटुंबांची परवडच...!गतमहिन्यात न्यायालयाच्या आदेशामुळे २८ कुटुंबांना १५ वर्षांपासून ताब्यात असलेल्या जमिनी सोडाव्या लागल्या.तर ७० कुटुंबाुपैकी १३ कुटुंबे अद्यापही जमिनी मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे एकदंरित ४१ कुटुंबांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागणार आहे.याकडे या कुटुंबाना विस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतलेले जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.धरणग्रस्तांची अशीही सामंजस्यता...कोणताही पुरावा नसताना काही मूळ मालकांनी या विस्थापित कुटुंबांच्या जमिनीवर ताबा मिळवला; परंतु कोणताही तंटाबखेडा न करता या कुटुंबांनी त्यांना हक्क दिला. प्रशासनाच्या माध्यमातून २९ कुटुंबांना जमिनी परत मिळाल्या. मात्र, या कुटुंबांनी मूळ मालकांनी पेरणीसाठी बी-बियाणे, मजुरी, आदींचा आलेला खर्च देऊन सामंजस्यता जपली. 

कोणताही ठोस पुरावा नसताना विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीवर हक्क सांगता येणार नाही. याबाबत न्यायालयाचा आदेश नसणाºया शेतकºयांना समजावून सांगितले. त्यांनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे या जमिनी संबंधित विस्थापित कुटुंबे कसू शकतात.- विठ्ठल दराडे, सहा. पोलीस निरीक्षक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना