शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू समाजाच्या बक्षिसपत्रासाठी दस्त अट शिथिल करावी : शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:53 IST

मुस्लिम समाजाला हिबा (बक्षिस) या कायद्याप्रमाणे बक्षिसपत्रासाठी दस्त नोंदणीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदू समाजालाही दस्ताची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील

ठळक मुद्दे कोल्हापूर  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभारतातील हिंदंूना एक कायदा व मुस्लिम समाजाला एक कायदा हे अन्यायकारक

कोल्हापूर : मुस्लिम समाजाला हिबा (बक्षिस) या कायद्याप्रमाणे बक्षिसपत्रासाठी दस्त नोंदणीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदू समाजालाही दस्ताची अट शिथिल करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

संजय पवार म्हणाले, मुस्लिम समाजाला हिबा या कायद्याप्रमाणे तोंडी स्वरूपात बक्षिसपत्र असेल व बक्षिसासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता झाली असेल, तर ते कायदेशीर मानले जाते. तोंडी बक्षिस पत्रासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी नोंदणी केलेला दस्त हवाच, अशी कोणतीही अट नाही; परंतु हिंदू समाजाला मात्र बक्षिसपत्रासाठी स्टॅँप ड्यूटी भरावी लागते. तसेच एक टक्का एलबीटीही त्यांना भरावा लागतो; त्यामुळे मुस्लिम समाजाची सवलत बंद न करता हिंदूंनाही त्याप्रमाणे सवलत द्यावी.

निवेदनात म्हटले आहे की, ‘खलीलउल्ला वि. इवाजअली ए. आय. आर. २२३ औध २१४’ या मुस्लिम कायद्याप्रमाणे बक्षिस पत्रासाठी नोंदणीची गरज नाही. भारतातील हिंदंूना एक कायदा व मुस्लिम समाजाला एक कायदा हे अन्यायकारक आहे. अनेक कुटुंबात बक्षिस पत्रावरून किंवा स्टॅँप ड्यूटी भरण्यावरून संघर्ष सुरू आहेत. अनेक ठिकाणी कायदेशीर लढाई सुरू आहे, तरी हिंदू समाजालाही १०० ते ५०० रुपये स्टॅँपवर बक्षिसपत्र करण्यासंदर्भात शासनाने कायदा करून दिलासा द्यावा.शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, प्रा. शिवाजी पाटील, राजू यादव, राजू पाटील, दिलीप देसाई, शशिकांत बिडकर, दिनेश परमार, रणजित आयरेकर, विराज ओतारी, रफिक नायकवडी, संजय जाधव, दिलीप जाधव, संदीप पाटील, प्रवीण पालव, अभिजित बुकशेठ, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर