शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक-सीमावासीयांमधील ऋणानुबंध’ दृढ--मल्टिस्टेटचा नवा आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 20:32 IST

म्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती

ठळक मुद्देसीमाभागातील १४ गावांना लाभ; स्वप्न पूर्ण होणार असल्याने नवचैतन्यराज्यात ऐतिहासिक ठरलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी मंडलिकांच्या विरोधात होती.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती. मात्र, प्रा. संजय मंडलिक यांच्यासह मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांनी मंडलिक कारखाना बहुराज्य (मल्टिस्टेट) करून सीमावासीयांनाही सभासदत्वासह या कारखान्याचे मालकत्व देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यामुळे मंडलिक आणि सीमावासीयांमधील ऋणानुबंध आणखी दृढ होणार आहेत. तसेच गेल्या दशकापासून या कारखान्याच्या सभासदत्वाची आस लागलेल्या सीमावासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सीमावासीय आपले मतदार नाहीत, याची कल्पना असतानाही केवळ मानवता धर्म पाळत दिवंगत लोकनेते मंडलिक सीमावासीयांच्या मदतीला धावून गेले. शेतीसाठी आवश्यक असणारी पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविली. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून मंडलिक आणि सीमावासीयांचे ऋणानुबंध घट्ट जोडले गेले. मतदान करू शकत नसले तरी त्यांनी मंडलिकांची नेहमीच पाठराखण केली.

१९९५ मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी पाटबंधारे राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच काळम्मावाडी धरणातील पाणी वाटपाचा योग्य असा निर्णय घेण्याचा चंग बांधला. जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन म्हाकवेहून पूर्वेकडे सीमाभागात जाणाºया आणि शेंडूर, करनूरकडील कच्च्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. तसेच ऐन जानेवारीपासून कोरड्या पडणाºया वेदगंगा नदीत आदमापूरच्या ओढ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, कच्च्या कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडणे धोकादायक आणि नियमबाह्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, होणाºया सर्व परिणामाला आणि जोखमीला आपण स्वत: जबाबदार असल्याचे सांगत मंडलिकांनी आपलाच शब्द खरा केला. त्यांच्या निर्णयाने सीमाभाग पाणीदार बनला.

त्याचबरोबर राज्यात ऐतिहासिक ठरलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी मंडलिकांच्या विरोधात होती. यावेळीही सीमावासीयांनी मतपेटीतून पाठबळ देणे अशक्य असले तरी लोकवर्गणी जमा करून म्हाकवे (ता. कागल) येथील प्रचारसभेत आर्थिक पाठबळ दिले होते. यामुळे मंडलिक आणि सीमावासीयांमध्ये अगदी जिव्हाळ्याचे संंबंध होते. अगदी मंडलिक यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सीमावासीयांनी कारखाना कार्यस्थळावर उपस्थिती लावली होती.दरम्यान, मंडलिकांच्या निधनानंतर हे भावबंध तुटले जातील की काय, अशी शंका वाटत होती. मात्र, मंडलिक कारखाना बहुराज्यीय करण्याच्या निर्णयामुळे हे ऋणानुबंध पूर्वीइतकेच दृढ होतील यात तीळमात्र शंका नाही....तर सीमाभागात कागल इतकेच सभासदकागल तालुक्यामध्ये राजकारणासह साखर कारखानदारांमध्ये ऊसदराची नेहमी चढाओढ असते. तसेच शेतकºयांना विविध योजना पुरविण्यातही स्पर्धा सुरू आहे. याचे मोठे आकर्षण सीमावासीयांना आहे. त्यामुळे येथील कारखान्यात सभासद होण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच उत्सुक असतात.मंडलिक कारखान्याने तर उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवत सभासदांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. त्यामुळे मल्टिस्टेटचा कायदेशीर मार्ग मोकळा होताच कागलच्या बरोबरीने सीमाभागातील सभासद होतील, असे जाणकारांचे मत आहे. 

 

केवळ साखर निर्मितीपुरते मर्यादित न राहता कारखाना कार्यस्थळावर शिक्षण, आरोग्य सुविधा, माती परीक्षण, प्रयोगशाळा, आदी सर्व सुविधा देऊन हा कारखाना कल्पवृक्ष व्हावा, तसेच मंडलिक साहेबांच्या स्वप्नातील कारखाना बनविण्यासाठी या कारखान्याची बहुराज्य नोंदणी करून घेऊ.- प्रा. संजय मंडलिक, अध्यक्ष, ‘सदा’साखर, हमीदवाडा‘दिवंगत मंडलिक आणि सीमावासीयांचे अतूट नाते आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मंडलिक कारखान्यामध्ये सभासद होण्यासाठी सीमावासीय आतूर आहेत. बहुराज्यीय कायद्याखाली या कारखान्याची नोंदणी त्वरित होऊन आम्हाला सभासद होण्याची संधी लवकर उपलब्ध व्हावी.’- अमर शिंत्रे (कुर्ली) व शिवाजी साखरे (हदनाळ, ता. चिक्कोडी)