शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पुनर्वसन घरकुलांचा निधी अन्यत्र वळविणार

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

जयभीमनगर, नेहरूनगरमधील लाभार्थी : झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभार्थी घरकुलांपासून वंचित होण्याची भीती

इचलकरंजी : शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनामधील जयभीम व नेहरूनगर याठिकाणी घरकुलांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असतानाच तेथील ७०९ लाभार्थ्यांमध्ये वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी त्याठिकाणचा निधी जाधव मळा, भोरे वसाहत, लालनगर व शहापूर पूरग्रस्त वसाहतीमधील घरकुले बांधण्यासाठी वळविण्यात येणार आहे.शहर झोपडपट्टीमुक्तीसाठी सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे व सत्तारूढ कॉँग्रेसने झोपडपट्टी वसाहतींचे सर्वेक्षण केले. त्यापैकी नेहरूनगर, जयभीम व रेणुका या तीन झोपडपट्टी वसाहतींचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत मंजुरी घेण्यात आली. जयभीम झोपडपट्टीतील ७२० व नेहरूनगरमधील ६३६ झोपडपट्टींचा प्रस्ताव मंजूर झाला. तर रेणुका झोपडपट्टीचे जाग्याचे आरक्षण बदलण्यासाठी तो प्रलंबित राहिला.झोपडपट्टी पुनर्वसनाच्या घरकुल इमारती बांधण्यासाठी ३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असून, त्याचा पावणेचार कोटी रुपयांचा पहिला हप्ता पालिकेला प्राप्त झाला आहे. तर ४.०८ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच नगरपालिकेला दिला आहे. सध्या जयभीमनगरमध्ये ११ इमारती पूर्ण अवस्थेत असून, त्यामध्ये ४४४ लाभार्थ्यांच्या घरकुलांची सोय आहे. त्याठिकाणी अद्याप १८६ लाभार्थी शिल्लक आहेत. नेहरूनगर येथे ४८ लाभार्थ्यांची घरकुल असलेली एक इमारत पूर्ण अवस्थेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याठिकाणी आणखीन ७५ लाभार्थ्यांनी आपली जागा रिकामी करून दिली आहे. त्यांच्यासाठीही तेथे इमारत लवकरच बांधली जाईल; पण त्याठिकाणी असलेल्या उर्वरित ५२३ लाभार्थ्यांनी आपल्या जागा रिकाम्या करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे तेथे या लाभार्थ्यांसाठी घरकुलांच्या इमारतींची बांधणी होणे सध्या तरी अशक्य वाटत आहे. त्यामुळे या ५२३ लाभार्थ्यांची घरकुलांविना मोठी पंचाईत होणार आहे. जयभीमनगरातील १८६ व नेहरूनगरमधील ५२३ अशा ७०९ लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी मंजूर असलेला निधी रद्द होऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी भोरे वसाहतीमधील ४८, जाधव मळा येथे १३२, शहापूर पूरग्रस्त वसाहतीमध्ये ३६ व लालनगरमधील लाभार्थ्यांना घरकुलांच्या इमारतीसाठी हा निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव पालिका तयार करीत आहे. (प्रतिनिधी)१४.५ कोटी रुपयांचा फेरप्रस्तावझोपडपट्टी पुनर्वसनाच्या घरकुलांच्या इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे रेंगाळले आहे. तर बांधकाम क्षेत्रातील सिमेंट व वाळूचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत इचलकरंजीत सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी आणखीन १४.५ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत ७ मार्चला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींनी चर्चा केली. त्यावेळी मंत्री मेहता यांनी प्रस्तावाचा शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.