शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासनासमोर ...

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पुनर्वसनाचा प्रश्न कसा मिटणार, असा प्रश्न पूरग्रस्तांना लागून राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासन कसे करते, याकडे पूरग्रस्तांचेदेखील लक्ष लागून राहिले आहे.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, याबाबत शिरोळ तालुका पूरग्रस्त संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सहा आठवड्यांत पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन सचिवांना १० जून २०२० ला दिले होते. त्या निर्णयाचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे पूरग्रस्त संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. तिची मंगळवारी (दि. ७) सुनावणी झाली. शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुनर्वसनाबाबत प्रश्नचिन्ह

पूरग्रस्तांचे पुनर्वसन करीत असताना आहे ती जंगम मालमत्ता अबाधित राखून कायमस्वरूपी पण तात्पुरत्या नागरी सुविधांसह त्यांचे पुनर्वसन करावे, अशी कैफियत न्यायालयात मांडण्यात आली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येणाऱ्या काळात शासनाकडून कसा सोडविला जाणार, याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.

कोट - यापूर्वीच्या आदेशाचे पालन झाले नसल्याने अवमान याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. न्यायालयाने महसूल व वनविभागाला पूरबाधितांच्या पुनर्वसनासाठी गावठाण विस्तारांतर्गत जागा उपलब्ध करून देणे व अन्यबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आठ आठवड्यांत कारवाईचे आदेश केले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून न्याय न मिळाल्याने न्यायालयात जावे लागले.

- पांडुरंग गायकवाड, अध्यक्ष, पूरग्रस्त संस्था