शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासनासमोर ...

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पुनर्वसनाचा प्रश्न कसा मिटणार, असा प्रश्न पूरग्रस्तांना लागून राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासन कसे करते, याकडे पूरग्रस्तांचेदेखील लक्ष लागून राहिले आहे.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, याबाबत शिरोळ तालुका पूरग्रस्त संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सहा आठवड्यांत पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन सचिवांना १० जून २०२० ला दिले होते. त्या निर्णयाचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे पूरग्रस्त संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. तिची मंगळवारी (दि. ७) सुनावणी झाली. शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुनर्वसनाबाबत प्रश्नचिन्ह

पूरग्रस्तांचे पुनर्वसन करीत असताना आहे ती जंगम मालमत्ता अबाधित राखून कायमस्वरूपी पण तात्पुरत्या नागरी सुविधांसह त्यांचे पुनर्वसन करावे, अशी कैफियत न्यायालयात मांडण्यात आली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येणाऱ्या काळात शासनाकडून कसा सोडविला जाणार, याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.

कोट - यापूर्वीच्या आदेशाचे पालन झाले नसल्याने अवमान याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. न्यायालयाने महसूल व वनविभागाला पूरबाधितांच्या पुनर्वसनासाठी गावठाण विस्तारांतर्गत जागा उपलब्ध करून देणे व अन्यबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आठ आठवड्यांत कारवाईचे आदेश केले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून न्याय न मिळाल्याने न्यायालयात जावे लागले.

- पांडुरंग गायकवाड, अध्यक्ष, पूरग्रस्त संस्था