शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासनासमोर ...

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पुनर्वसनाचा प्रश्न कसा मिटणार, असा प्रश्न पूरग्रस्तांना लागून राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासन कसे करते, याकडे पूरग्रस्तांचेदेखील लक्ष लागून राहिले आहे.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, याबाबत शिरोळ तालुका पूरग्रस्त संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सहा आठवड्यांत पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन सचिवांना १० जून २०२० ला दिले होते. त्या निर्णयाचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे पूरग्रस्त संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. तिची मंगळवारी (दि. ७) सुनावणी झाली. शिरोळ तालुक्यातील ४३ गावांतील पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आठ आठवड्यांत करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुनर्वसनाबाबत प्रश्नचिन्ह

पूरग्रस्तांचे पुनर्वसन करीत असताना आहे ती जंगम मालमत्ता अबाधित राखून कायमस्वरूपी पण तात्पुरत्या नागरी सुविधांसह त्यांचे पुनर्वसन करावे, अशी कैफियत न्यायालयात मांडण्यात आली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येणाऱ्या काळात शासनाकडून कसा सोडविला जाणार, याबाबत सध्यातरी प्रश्नचिन्ह आहे.

कोट - यापूर्वीच्या आदेशाचे पालन झाले नसल्याने अवमान याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्यायालयाने चांगला निर्णय दिला आहे. न्यायालयाने महसूल व वनविभागाला पूरबाधितांच्या पुनर्वसनासाठी गावठाण विस्तारांतर्गत जागा उपलब्ध करून देणे व अन्यबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आठ आठवड्यांत कारवाईचे आदेश केले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून न्याय न मिळाल्याने न्यायालयात जावे लागले.

- पांडुरंग गायकवाड, अध्यक्ष, पूरग्रस्त संस्था