शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

वनविभागाच्या त्रासाला कंटाळून पुनर्वसन

By admin | Updated: May 3, 2017 00:43 IST

दाजीपुरात वन्य प्राण्यांकडून पिकांचा फडशा : मागण्यांबाबत गावनिहाय गावसभा

संजय पारकर ---राधानगरी --विस्तारित अभयारण्य झाल्यानंतर सुरुवातीला काही वर्षे याबाबतच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे लोकांचा याला फारसा विरोध झाला नाही. मात्र, त्यानंतर पंधरा वर्षांनंतर वन्यजीव विभाग लोकांना त्रास देऊ लागला. वन्यप्राणीही पिके व जनावरांना लक्ष्य करू लागल्यानंतर लोकांत जागृती होऊ लागली. सुरुवातीला दाजीपूर परिसरातील काही वाड्यांनी विरोध करायला सुरुवात केली. मात्र, त्यांची ताकद अपुरी पडत असल्याने वनविभागाकडून त्यांची फारशी दखल घेतली जात नव्हती.जून २००० मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महसूल व वन्यजीव विभागाने या लोकांच्या हक्क व मागण्यांबाबत गावनिहाय गावसभा घेतल्या. वन्यजीव विभागाच्या त्रासाला कंटाळलेल्या काही गावांनी आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. यात कारिवडे, रानोशेवाडी, डिगस, नवे व जुने करंजे, दावूतवाडी, एजिवडे, शेळप, बांबर, मांडरेवाडी, कदमवाडी, हसणे, सतीचामाळ, धनगरवाडा, हरिजनवाडा, ओलवन, माळेवाडी, दाजीपूर, भटवाडी, शिवाचीवाडी, रामनवाडी, गावठाण, पाटपन्हाळे व त्याचे धनगरवडे, भोसलेवाडी, भैरीबांबर, आसनगाव व फराळे धनगरवाडे या तीस वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. यात ११५६ कुटुंबे, त्यांची १४७७ घरे व २४११ हेक्टर जमिनींचा समावेश आहे. नोव्हेंबर २००० मध्ये याबाबतचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. त्यावेळी यासाठी १७५ कोटी रुपये निधी लागेल, असा अंदाज होता.मात्र, हा निधी वनविभागाने द्यावा तरच पुढील प्रक्रिया सुरू करता येईल, अशी भूमिका महसूल विभागाने घेतली. त्यामुळे हा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. यात बरीच वर्षे गेल्याने लोकांनी आपल्या घरामध्ये व मालमत्तेमध्ये सुधारणा केली आहे शिवाय शासकीय निधीतून काही विकासकामे झाली आहेत. त्यामुळे यासाठी आता मोठा निधी लागणार आहे.दोन-तीन वर्षांपूर्वी स्वेच्छा पुनर्वसन योजना पुढे आली. त्यात कुटुंबाला एकरकमी दहा लाख रुपये देण्यात येतात. यानुसार दोन वर्षांत फक्त एजिवडे येथील शंभरावर कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. आजची स्थिती पाहता याला अन्य लोकांचा विरोध आहे. त्यामुळे ही योजनाही सध्या जैसे थे आहे.३० नोव्हेंबर २०१६ रोजी वन्यजीव विभागाने दुय्यम निबंधक यांना पत्र देऊन या क्षेत्रात समावेश असलेल्या गावात जमिनी व अन्य मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करण्यास मनाई केली आहे. ग्रामपंचायती, तलाठी यांनी मूळ मालकी हक्कात फेरफार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे असे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांना घरांची दुरुस्ती, नवीन बांधकाम करणे अशक्य झाले आहे. शासकीय योजनेतून मंजूर झालेली घरकुले बांधता येत नाहीत.