शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वनविभागाच्या त्रासाला कंटाळून पुनर्वसन

By admin | Updated: May 3, 2017 00:43 IST

दाजीपुरात वन्य प्राण्यांकडून पिकांचा फडशा : मागण्यांबाबत गावनिहाय गावसभा

संजय पारकर ---राधानगरी --विस्तारित अभयारण्य झाल्यानंतर सुरुवातीला काही वर्षे याबाबतच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे लोकांचा याला फारसा विरोध झाला नाही. मात्र, त्यानंतर पंधरा वर्षांनंतर वन्यजीव विभाग लोकांना त्रास देऊ लागला. वन्यप्राणीही पिके व जनावरांना लक्ष्य करू लागल्यानंतर लोकांत जागृती होऊ लागली. सुरुवातीला दाजीपूर परिसरातील काही वाड्यांनी विरोध करायला सुरुवात केली. मात्र, त्यांची ताकद अपुरी पडत असल्याने वनविभागाकडून त्यांची फारशी दखल घेतली जात नव्हती.जून २००० मध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महसूल व वन्यजीव विभागाने या लोकांच्या हक्क व मागण्यांबाबत गावनिहाय गावसभा घेतल्या. वन्यजीव विभागाच्या त्रासाला कंटाळलेल्या काही गावांनी आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. यात कारिवडे, रानोशेवाडी, डिगस, नवे व जुने करंजे, दावूतवाडी, एजिवडे, शेळप, बांबर, मांडरेवाडी, कदमवाडी, हसणे, सतीचामाळ, धनगरवाडा, हरिजनवाडा, ओलवन, माळेवाडी, दाजीपूर, भटवाडी, शिवाचीवाडी, रामनवाडी, गावठाण, पाटपन्हाळे व त्याचे धनगरवडे, भोसलेवाडी, भैरीबांबर, आसनगाव व फराळे धनगरवाडे या तीस वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. यात ११५६ कुटुंबे, त्यांची १४७७ घरे व २४११ हेक्टर जमिनींचा समावेश आहे. नोव्हेंबर २००० मध्ये याबाबतचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. त्यावेळी यासाठी १७५ कोटी रुपये निधी लागेल, असा अंदाज होता.मात्र, हा निधी वनविभागाने द्यावा तरच पुढील प्रक्रिया सुरू करता येईल, अशी भूमिका महसूल विभागाने घेतली. त्यामुळे हा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. यात बरीच वर्षे गेल्याने लोकांनी आपल्या घरामध्ये व मालमत्तेमध्ये सुधारणा केली आहे शिवाय शासकीय निधीतून काही विकासकामे झाली आहेत. त्यामुळे यासाठी आता मोठा निधी लागणार आहे.दोन-तीन वर्षांपूर्वी स्वेच्छा पुनर्वसन योजना पुढे आली. त्यात कुटुंबाला एकरकमी दहा लाख रुपये देण्यात येतात. यानुसार दोन वर्षांत फक्त एजिवडे येथील शंभरावर कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. आजची स्थिती पाहता याला अन्य लोकांचा विरोध आहे. त्यामुळे ही योजनाही सध्या जैसे थे आहे.३० नोव्हेंबर २०१६ रोजी वन्यजीव विभागाने दुय्यम निबंधक यांना पत्र देऊन या क्षेत्रात समावेश असलेल्या गावात जमिनी व अन्य मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करण्यास मनाई केली आहे. ग्रामपंचायती, तलाठी यांनी मूळ मालकी हक्कात फेरफार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे असे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांना घरांची दुरुस्ती, नवीन बांधकाम करणे अशक्य झाले आहे. शासकीय योजनेतून मंजूर झालेली घरकुले बांधता येत नाहीत.