शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे मगच पाणीपूजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन ...

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे कायद्याप्रमाणे पुर्नवसन करावे, पाणीसाठा झाला आहे. गेली वीस वर्षे कायद्याप्रमाणे पुनर्वसन करावे यासाठी धरणग्रस्त शांततेच्या मार्गाने लढत आहेत. मात्र धरणग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यामध्ये शासन व लोकप्रतिनिधी कमी पडले. आता पाणीपूजनाची घाई सुरू झाली आहे. हे पाणीपूजन ज्येष्ठ प्रकल्पग्रस्तांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संघटनेने पत्रकातून केली आहे.

धरणात पाणीही साठले मग पुनर्वसनाचे काय?

कोरोनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात लोकांना येण्यास मज्जाव केला. मात्र घळभरणीचे काम चालूच होते. निदान आता तरी पुनर्वसनाचे काम प्राधान्याने व्हावे आणि पाणीपूजन करताना ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला व त्यामुळे धरण झाले. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ धरणग्रस्तांच्या हस्ते पाणीपूजन झाले पाहिजे. तत्पूर्वी पुनर्वसन पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

?????

प्रसिद्धीपत्रकावर कॉ. संपत देसाई, कॉ. अशोक जाधव, शिवाजी गुरव, सदानंद व्हनबट्टे आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.