शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

१६१ गावांमध्ये सत्तांतर

By admin | Updated: July 28, 2015 01:23 IST

प्रस्थापितांचा सुपडासाफ : करवीरमध्ये काँग्रेस, पन्हाळा-शाहूवाडीत ‘जनसुराज्य’चे वर्चस्व

कोल्हापूर : जिल्ह्यात अत्यंत अटीतटीने व चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत ३७० पैकी १६१ ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत सत्तांतर घडविले. करवीरमध्ये काँग्रेसने, तर पन्हाळा-शाहूवाडीत ‘जनसुराज्य’ने प्राबल्य राखले. शिवसेनेने अनेक ठिकाणी मुसंडी मारली असून, उर्वरित तालुक्यांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. अनेक ठिकाणी त्रिशंकू संख्याबळामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ३७० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८५.१८ टक्के मतदान झाले होते. १५०७ प्रभागांतील ३९६३ जागांसाठी तब्बल ७७९० उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी १७ ठिकाणी सत्तांतर झाले. येथे स्थानिक आघाड्यांमध्येच लढती झाल्या असल्या तरी करवीर मतदारसंघातील बहुतांश गावांत पी. एन. पाटील गटाने, तर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील गटाने आपले वर्चस्व राखले आहे. कोपार्डे, खाटांगळे, कुडित्रे येथे सत्तांतर करत आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारली. पन्हाळा तालुक्यात १२ ठिकाणी सत्तांतर झाले असून, येथे माजी मंत्री विनय कोरे यांच्या गटाने १९ ठिकाणी यश संपादन करत वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेलाही ११ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. शाहूवाडी तालुक्यातही जनसुराज्य-काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. येथे ३६ पैकी १८ ठिकाणी सत्तांतर झाले असून, शिवसेनेला मात्र आपले गड शाबूत राखताना दमछाक उडाली. भुदरगडमध्ये स्थानिक आघाड्यांत निवडणुका झाल्या. येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींचा दावा केला असला तरी पक्षीय बलाबलाचे चित्र सरपंच निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. गगनबावडा तालुक्यात तीन ठिकाणी सत्तांतर झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादीने आपले गड शाबूत ठेवले असले तरी शिवसेना पाच ठिकाणी सत्तेत आली. शिरोळमध्ये दहा ठिकाणी सत्तांतर झाले असून, येथे स्थानिक आघाड्यांनीच प्राबल्य राखले. हातकणंगलेमध्ये दहा ठिकाणी सत्तांतर झाले असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. चंदगडमध्ये १८ ठिकाणी सत्तांतर झाले असून, ‘स्वाभिमानी’, शिवसेनेने प्रत्येकी दोन, तर काँग्रेसने सहा ठिकाणी सत्ता राखली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्णपणे पीछेहाट झाली. आजऱ्यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली असून, आठ ठिकाणी सत्तांतर झाले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांना जोरदार झटका बसला. राधानगरीमध्ये केवळ गुडाळमध्ये सत्तांतर झाले. पक्षीय बलाबल पाहता तीन राष्ट्रवादी, चार काँग्रेस, तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. गडहिंग्लजमध्ये २४ ठिकाणी सत्तांतर झाले आहे. सोयीच्या आघाड्यांनी कागलमध्ये त्रांगडेकागलचे राजकारण पक्षापेक्षा गटा-तटांवरच अवलंबून आहे. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत विचित्र आघाड्या झाल्या होत्या. काही ठिकाणी मंडलिक-मुश्रीफ विरुद्ध घाटगे गट, तर १७ ठिकाणी मुश्रीफ गट विरुद्ध सर्वजण, अशा लढती झाल्या होत्या. त्यामुळे सत्तेचे बलाबल ठरविणे अवघड आहे.