शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१६१ गावांमध्ये सत्तांतर

By admin | Updated: July 28, 2015 01:23 IST

प्रस्थापितांचा सुपडासाफ : करवीरमध्ये काँग्रेस, पन्हाळा-शाहूवाडीत ‘जनसुराज्य’चे वर्चस्व

कोल्हापूर : जिल्ह्यात अत्यंत अटीतटीने व चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत ३७० पैकी १६१ ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत सत्तांतर घडविले. करवीरमध्ये काँग्रेसने, तर पन्हाळा-शाहूवाडीत ‘जनसुराज्य’ने प्राबल्य राखले. शिवसेनेने अनेक ठिकाणी मुसंडी मारली असून, उर्वरित तालुक्यांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. अनेक ठिकाणी त्रिशंकू संख्याबळामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ३७० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८५.१८ टक्के मतदान झाले होते. १५०७ प्रभागांतील ३९६३ जागांसाठी तब्बल ७७९० उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी १७ ठिकाणी सत्तांतर झाले. येथे स्थानिक आघाड्यांमध्येच लढती झाल्या असल्या तरी करवीर मतदारसंघातील बहुतांश गावांत पी. एन. पाटील गटाने, तर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील गटाने आपले वर्चस्व राखले आहे. कोपार्डे, खाटांगळे, कुडित्रे येथे सत्तांतर करत आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारली. पन्हाळा तालुक्यात १२ ठिकाणी सत्तांतर झाले असून, येथे माजी मंत्री विनय कोरे यांच्या गटाने १९ ठिकाणी यश संपादन करत वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेलाही ११ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. शाहूवाडी तालुक्यातही जनसुराज्य-काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. येथे ३६ पैकी १८ ठिकाणी सत्तांतर झाले असून, शिवसेनेला मात्र आपले गड शाबूत राखताना दमछाक उडाली. भुदरगडमध्ये स्थानिक आघाड्यांत निवडणुका झाल्या. येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींचा दावा केला असला तरी पक्षीय बलाबलाचे चित्र सरपंच निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. गगनबावडा तालुक्यात तीन ठिकाणी सत्तांतर झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादीने आपले गड शाबूत ठेवले असले तरी शिवसेना पाच ठिकाणी सत्तेत आली. शिरोळमध्ये दहा ठिकाणी सत्तांतर झाले असून, येथे स्थानिक आघाड्यांनीच प्राबल्य राखले. हातकणंगलेमध्ये दहा ठिकाणी सत्तांतर झाले असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. चंदगडमध्ये १८ ठिकाणी सत्तांतर झाले असून, ‘स्वाभिमानी’, शिवसेनेने प्रत्येकी दोन, तर काँग्रेसने सहा ठिकाणी सत्ता राखली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्णपणे पीछेहाट झाली. आजऱ्यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली असून, आठ ठिकाणी सत्तांतर झाले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांना जोरदार झटका बसला. राधानगरीमध्ये केवळ गुडाळमध्ये सत्तांतर झाले. पक्षीय बलाबल पाहता तीन राष्ट्रवादी, चार काँग्रेस, तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. गडहिंग्लजमध्ये २४ ठिकाणी सत्तांतर झाले आहे. सोयीच्या आघाड्यांनी कागलमध्ये त्रांगडेकागलचे राजकारण पक्षापेक्षा गटा-तटांवरच अवलंबून आहे. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत विचित्र आघाड्या झाल्या होत्या. काही ठिकाणी मंडलिक-मुश्रीफ विरुद्ध घाटगे गट, तर १७ ठिकाणी मुश्रीफ गट विरुद्ध सर्वजण, अशा लढती झाल्या होत्या. त्यामुळे सत्तेचे बलाबल ठरविणे अवघड आहे.