शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

आंदोलनानंतरही दुर्लक्षितच

By admin | Updated: December 19, 2014 00:10 IST

प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरूच : एन. डी. पाटील यांच्याकडून आंदोलकांची विचारपूस

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सलग दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरू राहिले. आज दिवसभरात या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करायला कोणाही शासकीय अधिकाऱ्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या सुरू केले. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ, वारणा आदी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कुटुंबांसह भाग घेतला आहे. आज या प्रकल्पग्रस्तांशी कोणी तरी शासकीय अधिकारी चर्चा करून मार्ग काढेल, अशी अपेक्षा होती; परंतु कोणीही त्यांना चर्चेस बोलाविले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल मांडून प्रकल्पग्रस्त दुपारचे व रात्रीचे जेवण बनवत आहेत. मंडपात पंगती पडतात. आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. निर्णय झाले; परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ केली आहे. त्यामुळे आता आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा अशोक जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. (प्रतिनिधी)कडाक्याच्या थंडीतहीसध्या शहरात कडाक्याची थंडी पडली आहे तरीही सर्व आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या फूटपाथवर बैठक मारली आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावरच थंडीत झोपावे लागत आहे. सोबतीला प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळी वाद्ये आणली असून थोडा वेळ भजन, भक्तिगीते गायली जातात. महानगरपालिकेने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.