शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

वकिलांचे लालफिती लावून कामकाज

By admin | Updated: August 29, 2014 00:54 IST

‘सर्किट बेंच’ची मागणी : सहा जिल्ह्यांतील वकिलांचे आंदोलन; उद्या लाक्षणिक बंद

कोल्हापूर : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकील गेली २५ वर्षे लढा देत आहेत; परंतु या मागणीला उच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या निषेधार्थ आज, गुरुवारी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी लालफिती लावून दिवसभर न्यायालयीन कामकाज केले. दरम्यान, शनिवारी (दि. ३०) एकदिवसीय लाक्षणिक बंद व न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूरला खंडपीठ व तत्पूर्वी सर्किट बेंच व्हावे यासाठी तब्बल ५८ दिवस सहा जिल्ह्यांतील वकिलांनी काम बंद ठेवून धरणे आंदोलन केले. त्याची दखल घेऊन मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सर्किट बेंचबाबत ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार वकिलांनी काम बंद आंदोलन मागे घेतले; परंतु वकिलांच्या या मागणीकडे न्यायाधीश शहा यांनी दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात कृती समितीने त्रिसदस्यीय समितीचे न्यायाधीश रणजित मोरे यांची भेट घेतली असता कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाचा ठराव आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाने पुन्हा अन्य ठिकाणी खंडपीठाची मागणी करणार नाही, अशा तरतुदीचा लेखी ठराव देण्याची त्यांनी मागणी केली. उच्च न्यायालयाची ही भूमिका दुटप्पी असल्याच्या निषेधार्थ खंडपीठ कृती समितीने काल, बुधवारी सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या अध्यक्षांची बैठक घेऊन स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरूकरण्याचा निर्धार केला. त्यानुसार आंदोलनाची सुरुवात म्हणून आज सहा जिल्ह्यांतील वकिलांनी लालफिती लावून न्यायालयीन कामकाजामध्ये भाग घेतला. कोल्हापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सर्व वकील एकत्र आले. त्यांनी प्रत्येकाच्या काळ्या कोटाला लालफीत लावून कामकाजाला सुरुवात केली. यामध्ये ज्येष्ठ वकिलांचा सहभाग मोठा होता. (प्रतिनिधी)इचलकरंजीत ३० ला आंदोलन इचलकरंजी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. ३० आॅगस्ट) इचलकरंजी येथील न्यायालयाच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय वकील व पक्षकारांनी घेतला असल्याचे इचलकरंजी बार असोसिएशनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्या दिवशी धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व पक्षकारांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. मुदगल यांनी केले आहे.