शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

खतांच्या किमती ताबडतोब कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST

एप्रिल महिन्यापासून केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रचंड दर वाढ केली. ही खतांची दरवाढ अन्यायकारक आहे. सरासरी एका बॅगमागे ...

एप्रिल महिन्यापासून केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रचंड दर वाढ केली. ही खतांची दरवाढ अन्यायकारक आहे. सरासरी एका बॅगमागे सहाशे ते नऊशे रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. देशातील शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे दर देण्याचे धोरण केंद्र सरकार राबवीत नाही. स्वामीनाथन्‌ आयोगानुसार शेतीमालाला दर मिळत नाही. त्यामुळे शेती तोट्यात चालली आहे.

खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून खतांच्या किमती वाढविल्याने हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, ही शेतकऱ्यांची मूळ मागणी असल्याचे सांगून गावडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांचे दर वाढल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये दरवाढ केल्याने, देशातील शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.

केंद्र शासनाने खतांच्या वाढलेल्या किमती ताबडतोब कमी कराव्यात, जुन्या दराने खत विक्री करावी, अन्यथा देशभरातील सर्व शेतकरी संघटना खत दरवाढीविरोधी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला.