शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

कोल्हापुरात गुरुवारपासून भरती, ‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 11:06 IST

गोव्यासह महाराष्ट्रातील  सहा जिल्ह्यांतील सैन्यभरती गुरुवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू होत आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केल्याची माहिती जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसैन्यभरतीस येणाऱ्या तरुणांसाठी ‘व्हाईट आर्मी’तर्फे अन्नछत्रकोल्हापुरात गुरुवारपासून भरती, अशोक रोकडे यांची माहिती १३ वषात ४.५ लाख तरुणांना लाभ

कोल्हापूर : गोव्यासह महाराष्ट्रातील  सहा जिल्ह्यांतील सैन्यभरती गुरुवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू होत आहे. या भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी ‘व्हाईट आर्मी’च्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केल्याची माहिती जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तेरा वर्षांत विविध जिल्ह्यांतील ४.५ लाख तरुणांना या अन्नछत्राचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.रोकडे म्हणाले, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे २००५ ला सैन्यभरतीला मोठ्या प्रमाणात तरुण आले होते. त्यावेळी त्या तरुणांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. भरतीसाठी सामान्य कुटुंबांतील मुले देशसेवेचे मोठे स्वप्न घेऊन भरतीसाठी आलेली असतात.

खाण्यापिण्याची सोय नसल्याने त्यांना बिस्किटे, पाणी पिऊन दिवस काढावे लागले. या तरुणांसाठी ‘व्हाईट आर्मी’ने सैनिक कार्यालयात अन्नछत्राची संकल्पना मांडली. तिला तत्काळ मंजुरी मिळाली. सैन्यभरतीवेळी अन्नछत्राची सुरुवात भारतात पहिल्यांदाच कोल्हापुरातून झाली.

आतापर्यंत सांगली, कवठेमहांकाळ, सोलापूर, फलटण, रत्नागिरी, गोवा अशा सैन्यभरतीच्या ठिकाणी जाऊन मोफत अन्नछत्र उभे करून भावी सैनिकांना आम्ही मानसिक बळ देण्याचे काम केले.

या अन्नछत्राची दखल भारतीय वायुसेनेने घेतली असून गोवा, जळगाव सैन्यभरतीवेळी वायुसेनेलाही मदत करण्यात आली. भारतीय स्थलसेना भरती, भारतीय वायुसेना भरती, १०९ टी ए मराठा भरती, माजी सैनिक हरित सेना भरती, एसआरपीएफ पोलीस भरती अशा अनेक भरतीच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षांत सुमारे साडेचार लाख तरुणांना लाभ झाल्याचे रोकडे यांनी सांगितले.अन्नछत्र चालविण्याची सर्व जबाबदारी ‘व्हाईट आर्मी’चे जवान स्वत: करतात. या उपक्रमात जवान जेवण बनवितात, शिस्तबद्ध पद्धतीने त्याचे वाटपही केले जाते. सैन्यदलातील मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडीअर्स, कर्नल, आदी अधिकाºयांनी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसाही केली आहे.

यासाठी कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती मदत करतात. गुरुवारपासून १६ डिसेंबरपर्यंत गोवा व सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तरुणांची सैन्यभरती शिवाजी विद्यापीठ येथे सुरू होत आहे. तिथे अन्नछत्राची सोय केल्याचे रोकडे यांनी सांगितले. यावेळी सचिन भोसले, प्रशांत शेंडे, शैलेश रावण, विष्णू कुंभार, देवराज सहानी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर