शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- भरती १,८०० पदांची; पण नोकरीसाठी १४ जण पात्र, रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांची कमतरता

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 16, 2023 15:55 IST

कौशल्य शिक्षणाचा अभाव असल्याने संधी नाही, मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा

इंदुमती गणेशकोल्हापूर : एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही, मोठ्या संख्येने तरुणाईमध्ये बेरोजगारी वाढत आहे, असे चित्र असताना दुसरीकडे बड्या कंपन्या, आस्थापना व उद्योजकांना पदवीसोबतच विशेष कौशल्य मिळवलेल्या पात्र उमेदवारांची कमतरता जाणवत आहे. मंगळवारी तपोवन मैदानावर झालेल्या रोजगार मेळाव्यात १,८०० पदे भरण्यात येणार होती, त्यासाठी ७०० हून अधिक उमेदवार आले; पण फक्त १४ जणांची अंतिम निवड झाली. एवढी मोठी विषमता कंपन्यांची अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आहे.जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य शहरांतील कंपन्या व आस्थापनादेखील आपल्याकडील रिक्त पदांसाठी सहभागी होतात. यातील कंपन्यांचा असा अनुभव आहे की, त्यांना अपेक्षित कौशल्य असलेले उमेदवार मिळत नाहीत. सुरुवातीला प्रशिक्षण घेत कमी पगारावर काम करण्याची तयारी नसते. जे टिकून काम करतात, अनुभव मिळवतात त्यांना बढती व पगार वाढवून मिळतो किंवा अन्य कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळते.

मुंबई-पुण्याचे फॅडमुला-मुलींमध्ये नोकरीबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत. कॉलेजमधून बाहेर पडलो की, पाच आकडी पगाराची मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा असते. आपल्याच शहर- जिल्ह्यात कमी पगाराची नोकरी करायची तयारी नसते. दुसऱ्या शहरांमध्ये पगार जास्त दिसत असला तरी घर सोडून एकट्याने राहणे, रूमचे भाडे, जेवणाचा खर्च, प्रवास खर्च, या सर्व बाबींचा विचार केला, तर दोन्ही पगारांचा हिशेब एकाच ठिकाणी येतो, हे मुलांना कळत नाही.

पदवी पुरेशी नाही

पदवी मिळाली की, आपण नोकरीला पात्र ठरलो, हा भ्रम आहे. कारण त्यासाेबत कोणते ना कोणते कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. कंपन्यांना अपेक्षित असलेले प्रशिक्षण घेतले पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचा बायोडेटा एकदम चांगला असतो; पण संवादकौशल्य व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभाव असतो. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपली छाप पडली पाहिजे.

कंपन्या आणि उमेदवारांना आम्ही एकाच व्यासपीठावर आणतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत व्यावसायिक कलाकौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. सुरुवातीला मिळालेली कमी पगाराची नोकरीही संयमाने करून अनुभव घेतला की, पुढे यशाचे मार्ग मिळत जातात. नोकरीऐवजी व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठीही विभागाकडून मार्गदर्शन व साहाय्य केले जाते. -संजय माळी, सहायक आयुक्त, कौशल्यविकास, रोजगार व उद्योग विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरी