शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- भरती १,८०० पदांची; पण नोकरीसाठी १४ जण पात्र, रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांची कमतरता

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 16, 2023 15:55 IST

कौशल्य शिक्षणाचा अभाव असल्याने संधी नाही, मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा

इंदुमती गणेशकोल्हापूर : एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही, मोठ्या संख्येने तरुणाईमध्ये बेरोजगारी वाढत आहे, असे चित्र असताना दुसरीकडे बड्या कंपन्या, आस्थापना व उद्योजकांना पदवीसोबतच विशेष कौशल्य मिळवलेल्या पात्र उमेदवारांची कमतरता जाणवत आहे. मंगळवारी तपोवन मैदानावर झालेल्या रोजगार मेळाव्यात १,८०० पदे भरण्यात येणार होती, त्यासाठी ७०० हून अधिक उमेदवार आले; पण फक्त १४ जणांची अंतिम निवड झाली. एवढी मोठी विषमता कंपन्यांची अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आहे.जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य शहरांतील कंपन्या व आस्थापनादेखील आपल्याकडील रिक्त पदांसाठी सहभागी होतात. यातील कंपन्यांचा असा अनुभव आहे की, त्यांना अपेक्षित कौशल्य असलेले उमेदवार मिळत नाहीत. सुरुवातीला प्रशिक्षण घेत कमी पगारावर काम करण्याची तयारी नसते. जे टिकून काम करतात, अनुभव मिळवतात त्यांना बढती व पगार वाढवून मिळतो किंवा अन्य कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळते.

मुंबई-पुण्याचे फॅडमुला-मुलींमध्ये नोकरीबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत. कॉलेजमधून बाहेर पडलो की, पाच आकडी पगाराची मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा असते. आपल्याच शहर- जिल्ह्यात कमी पगाराची नोकरी करायची तयारी नसते. दुसऱ्या शहरांमध्ये पगार जास्त दिसत असला तरी घर सोडून एकट्याने राहणे, रूमचे भाडे, जेवणाचा खर्च, प्रवास खर्च, या सर्व बाबींचा विचार केला, तर दोन्ही पगारांचा हिशेब एकाच ठिकाणी येतो, हे मुलांना कळत नाही.

पदवी पुरेशी नाही

पदवी मिळाली की, आपण नोकरीला पात्र ठरलो, हा भ्रम आहे. कारण त्यासाेबत कोणते ना कोणते कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. कंपन्यांना अपेक्षित असलेले प्रशिक्षण घेतले पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचा बायोडेटा एकदम चांगला असतो; पण संवादकौशल्य व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभाव असतो. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपली छाप पडली पाहिजे.

कंपन्या आणि उमेदवारांना आम्ही एकाच व्यासपीठावर आणतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत व्यावसायिक कलाकौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. सुरुवातीला मिळालेली कमी पगाराची नोकरीही संयमाने करून अनुभव घेतला की, पुढे यशाचे मार्ग मिळत जातात. नोकरीऐवजी व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठीही विभागाकडून मार्गदर्शन व साहाय्य केले जाते. -संजय माळी, सहायक आयुक्त, कौशल्यविकास, रोजगार व उद्योग विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरी