शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

घरफाळ्याचे पावणे तीन कोटी वसूल

By admin | Updated: November 12, 2016 00:53 IST

सुविधा केंद्रांवर गर्दी : पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारल्या

कोल्हापूर : राज्य सरकारच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत घरफाळा, पाणीपट्टी वसुलीकरिता ५०० व १००० रुपयांच्या नोटा भरून घेतल्या. त्यासाठी पाचही नागरी सुविधा केंद्रांत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केवळ एका दिवसात २ कोटी ८६ लाख वसुली झाल्याचे सांगण्यात आले. ५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यामुळे बुधवार व गुरुवार (दि. ९ व १०) पासून महानगरपालिकेने या नोटा स्वीकारण्याचे नाकारले. घरफाळा, पाणीपट्टी, परवाना शुल्क, दुकानगाळ्यांचे भाडे अशा स्वरूपाची कोणतीही रक्कम महानगरपालिकेने स्वीकारली नाही. त्यामुळे या दोन दिवसांत केवळ आठ ते दहा लाखांची वसुली झाली. याचा दोन दिवसांत मोठा फटका बसला; परंतु गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारचे एक परिपत्रक प्रशासनाला मिळाले. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत घरफाळा, पाणीपट्टीच्या वसुलीकरिता ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात, अशा सूचना या परिपत्रकानुसार मिळाल्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून शहरातील महापालिका मुख्य कार्यालय, शिवाजी मार्केट, गांधी मैदान, बागल मार्केट, ताराराणी चौक या पाचही नागरी सुविधा केंद्रांत ही सुविधा उपलब्ध करून दिली. सर्वच सुविधा केंद्रांत दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळनंतर ही गर्दी कमी-कमी होत गेली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत तब्बल २ कोटी ४६लाख ४३ हजार ३११ रुपयांची वसुली झाल्याचे लेखापरीक्षक संजय सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, ही सुविधा आणखी ७२ तासांनी वाढविल्याची अफवा पसरली होती; परंतु आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्य सरकारकडे याबाबत चौकशी केली असता असा कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री बारा वाजता ही सुविधा १४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)३० डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवा : आजरेकर राज्य सरकारने जुन्या नोटा भरून घेण्यास महानगरपालिके ला ३० डिसेंबरपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी शुक्रवारी केली. महानगरपालिका हा सरकारचाच एक भाग आहे. सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना बॅँकेच्या दारात मोठ्या रांगेत उभे राहून नोटा बदलणे आणि पुन्हा त्या महापालिके त कराच्या स्वरूपात भरणे अधिक त्रासाचे होणार आहे. त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी, त्यामुळे नागरिकांचा त्रासही कमी होईल आणि महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढेल, असे आजरेकर यांनी म्हटले आहे.