शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

रंकाळ्यातील गाळ तपासणी सुरू

By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST

पंधरा दिवसांत परीक्षण : पाणी शुध्दीकरणासाठी होणार उपाययोजना

कोल्हापूर : रंकाळ्यातील हिरवे झालेले पाणी नैसर्गिकरित्याच शुद्ध व्हावे यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची चाचपणी करण्यासाठी रंकाळ्याच्या गाळाची तपासणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. नेरूळ येथील संस्थेला हे काम सोपविण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत गाळाच्या तपासणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात थांबले असले तरी गाळातील सांडपाण्याच्या अंशामुळे पुन्हा पाण्याचा रंग बदलू शकतो. रंकाळ्याची या समस्येतून कायमची मुक्तता करण्यासाठी रंकाळ्यातील गाळाचा ‘बॅरोमेट्रीक सर्व्हे’ केला जाणार आहे. पाण्याची खोली व गाळाचे गुणधर्म याची माहिती या सर्व्हेतून समजण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून सव्वा चार कोटी रुपये खर्चून शाम सोसायटी ते दुधाळी नाल्यापर्यंत ९०० व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली. रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या परताळा या ठिकाणी सानेगुरुजी वसाहतीतून आलेले चार लाख लिटर सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत होते, तर शाम सोसायटी नाल्यातून आलेले तब्बल १० एमएलडी पाणी दुसऱ्या बाजूने रंकाळ्यात मिसळते. दोन्ही ठिकाणचे पाणी एकत्र करून ड्रेनेज लाईनद्वारे दुधाळी नाल्यात सोडण्यात आले. हे पाणी दुधाळी येथे २६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सोडले आहे. मात्र, यापूर्वी सोडलेल्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्याचा मूळ गुणधर्मच बदलला आहे. रंकाळ्याच्या गाळात अडकलेल्या ब्लू अग्लीसारख्या वनस्पती व गाळातील सांडपाण्याच्या अंशांमुळे रंकाळ्याचे पाणी वारंवार रंग बदलून दुर्गंधीयुक्त होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात गाळाची शास्त्रीय चाचणी केली जाणार आहे. त्यानुसार रंकाळ्याच्या दूषित पाणी कायमचे शुद्ध राहण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे समजणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)