शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

रंकाळ्यातील गाळ तपासणी सुरू

By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST

पंधरा दिवसांत परीक्षण : पाणी शुध्दीकरणासाठी होणार उपाययोजना

कोल्हापूर : रंकाळ्यातील हिरवे झालेले पाणी नैसर्गिकरित्याच शुद्ध व्हावे यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याची चाचपणी करण्यासाठी रंकाळ्याच्या गाळाची तपासणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. नेरूळ येथील संस्थेला हे काम सोपविण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत गाळाच्या तपासणीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती जलअभियंता मनिष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात थांबले असले तरी गाळातील सांडपाण्याच्या अंशामुळे पुन्हा पाण्याचा रंग बदलू शकतो. रंकाळ्याची या समस्येतून कायमची मुक्तता करण्यासाठी रंकाळ्यातील गाळाचा ‘बॅरोमेट्रीक सर्व्हे’ केला जाणार आहे. पाण्याची खोली व गाळाचे गुणधर्म याची माहिती या सर्व्हेतून समजण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून सव्वा चार कोटी रुपये खर्चून शाम सोसायटी ते दुधाळी नाल्यापर्यंत ९०० व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली. रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या परताळा या ठिकाणी सानेगुरुजी वसाहतीतून आलेले चार लाख लिटर सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत होते, तर शाम सोसायटी नाल्यातून आलेले तब्बल १० एमएलडी पाणी दुसऱ्या बाजूने रंकाळ्यात मिसळते. दोन्ही ठिकाणचे पाणी एकत्र करून ड्रेनेज लाईनद्वारे दुधाळी नाल्यात सोडण्यात आले. हे पाणी दुधाळी येथे २६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सोडले आहे. मात्र, यापूर्वी सोडलेल्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्याचा मूळ गुणधर्मच बदलला आहे. रंकाळ्याच्या गाळात अडकलेल्या ब्लू अग्लीसारख्या वनस्पती व गाळातील सांडपाण्याच्या अंशांमुळे रंकाळ्याचे पाणी वारंवार रंग बदलून दुर्गंधीयुक्त होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात गाळाची शास्त्रीय चाचणी केली जाणार आहे. त्यानुसार रंकाळ्याच्या दूषित पाणी कायमचे शुद्ध राहण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे समजणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)