शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘स्थायी’त अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By admin | Updated: June 3, 2017 00:48 IST

‘स्थायी’त अधिकाऱ्यांची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पूर्वनियोजित साप्ताहिक सभा असतानाही आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासमवेत फिरतीस गेलेल्या दोन अधिकाऱ्यांची शुक्रवारी स्थायी समिती सभेत चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. अधिकारी येत नाहीत तोपर्यंत सभाच चालू करणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर दोन अधिकारी सभागृहात आले खरे पण त्यांना सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यापुढे जबाबदार अधिकारी सभेस आले नाहीत तर सभा घेतली जाणार नाही, असा इशारा सभाध्यक्ष संदीप नेजदार यांनी दिला. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली; परंतु जबाबदार अधिकारी नसल्याने ही सभा उशिराने सुरू झाली. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली झाल्याने त्यांनी गुरुवारीच कार्यभार सोडला. दुसरे उपायुक्त विजय खोराटे रजेवर होते तर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर आयुक्त चौधरी यांच्यासमवेत फिरतीस गेले होते. त्यामुळे सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागची सभा अधिकारी नसल्यामुळे त्यांचा निषेध करून तहकुब करण्यात आली होती. यावेळी तरी अधिकारी उपस्थित राहतील अशी अपेक्षा असताना चित्र उलटेच होते. सभेस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे पगार कापण्यात यावेत, अशी सूचना जयश्री चव्हाण यांनी केली. जोपर्यंत जबाबदार अधिकारी सभागृहात येत नाहीत तोपर्यंत कामकाज होणार नाही, अशी भूमिका सभापती नेजदार यांनी घेतली. त्यामुळे आयुक्तांसोबत फिरतीवर असलेल्या अधिकाऱ्यांना निरोप धाडण्यात आले. दुपारी पावणेदोन वाजता शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व आरोग्याधिकारी अरुण परितेकर सभागृहात आले. त्यांचे आगमन होताच सदस्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. सभा असताना तुम्ही फिरती कशी काय आयोजित केली, अशा शब्दांत सभापतींनी अधिकाऱ्यांना झापले. यापुढे असे घडले तर सभा घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलण्याकरीता डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामावर मनपा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे ते सदोष होत आहे. कन्सल्टंटने खुदाई करून टेस्टिंग केलेले नाही,जागेवरील पाहणी केलेली नाही. कार्यालयात बसून डीपीआर केला जात आहे. मग त्यांना अडीच कोटी रुपये फी कशासाठी द्यायची, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी सभेत केली. त्यावेळी जलअभियंता यांनी कामावर लक्ष ठेवावे. जर कन्सल्टंटचे काम व्यवस्थित नसेल तर आयुक्तांना तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी दिले. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत मनिषा कुंभार, उमा इंगळे, आशिष ढवळे, जयश्री चव्हाण, कविता माने, रिना कांबळे आदींनी भाग घेतला. ‘नेचर इन निड’कडे ८० लाखांची थकबाकीजैववैद्यकीय कचरा गोळा करण्याचा ठेका ‘नेचर इन निड’ला देण्यात आला असून त्यांच्याकडे ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांत जागेचे भाडे भरलेले नाही. शहरातील डॉक्टर्सकडून नियमबाह्ण वसुली सुरू आहे म्हणूनच त्यांच्याकडील वसुली तातडीने करण्यात यावी अथवा त्यांचे प्रक्रिया केंद्र सील करावे, अशी मागणी नीलोफर आजरेकर व सत्यजित कदम यांनी केली. त्यावेळी जैववैद्यकीय कचरा उचलणे बंद झाले तर महापालिकेवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोटीस देऊन त्यांच्याकडून वसुली केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.