शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही  : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:36 IST

अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

ठळक मुद्देभांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही  : राजू शेट्टीफास या कांदबरीचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे हिंदीतील प्रसिद्ध कांदबरीकार संजीव यांच्या फाँस या कादंबरीचे बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या मराठीतील अनुवादीत ‘फास’ या कांदबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे होते.महावीर महाविद्यालयातील अ‍ॅम्पी थिएटरमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, भाजी स्वस्तात मिळावी ही अपेक्षा करणं यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी काय करायचे हे तो ठरवू शकत नाही. ते अन्य जण ठरवतात. ही फार मोठी शोकांतिका असून, तो या चक्रव्यूहामध्ये अडकला आहे.

शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, मात्र साहित्य क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न क्वचितच मांडले जातात. अशा परिस्थितीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे कौतुकास्पद आहे. कृष्णात खोत म्हणाले, कोणत्याही लेखकाला भाषा, प्रांत यांचे बंधन नसते. साहित्य हे व्यवस्थेविषयीचा राग व्यक्त करत असते.नामदेव माळी म्हणाले, फास ही अनुवादित कादंबरी शेतकऱ्यांच्या फासापुरतीच सीमित राहत नाही, तर समाजातील जातिव्यवस्था, विसंगत परिस्थितीवरही भाष्य करते. लेखक बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, लेखक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री कासोटी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. आभार डॉ. विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संस्कृतीचा घटकसध्या दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तशीच परिस्थिती भविष्यात अन्नासाठी करावी लागेल. अशी संहारक परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, तर आज शेतकऱ्याला सर्वांनी मिळून जगविण्याची गरज आहे. शेतकरी हा संस्कृतीचा घटक मानला गेला तर त्याचे अनेक प्रश्न सामूहिकरीत्या सोडवता येतील.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर