शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही  : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:36 IST

अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

ठळक मुद्देभांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही  : राजू शेट्टीफास या कांदबरीचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे हिंदीतील प्रसिद्ध कांदबरीकार संजीव यांच्या फाँस या कादंबरीचे बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या मराठीतील अनुवादीत ‘फास’ या कांदबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे होते.महावीर महाविद्यालयातील अ‍ॅम्पी थिएटरमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, भाजी स्वस्तात मिळावी ही अपेक्षा करणं यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी काय करायचे हे तो ठरवू शकत नाही. ते अन्य जण ठरवतात. ही फार मोठी शोकांतिका असून, तो या चक्रव्यूहामध्ये अडकला आहे.

शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, मात्र साहित्य क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न क्वचितच मांडले जातात. अशा परिस्थितीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे कौतुकास्पद आहे. कृष्णात खोत म्हणाले, कोणत्याही लेखकाला भाषा, प्रांत यांचे बंधन नसते. साहित्य हे व्यवस्थेविषयीचा राग व्यक्त करत असते.नामदेव माळी म्हणाले, फास ही अनुवादित कादंबरी शेतकऱ्यांच्या फासापुरतीच सीमित राहत नाही, तर समाजातील जातिव्यवस्था, विसंगत परिस्थितीवरही भाष्य करते. लेखक बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, लेखक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री कासोटी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. आभार डॉ. विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संस्कृतीचा घटकसध्या दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तशीच परिस्थिती भविष्यात अन्नासाठी करावी लागेल. अशी संहारक परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, तर आज शेतकऱ्याला सर्वांनी मिळून जगविण्याची गरज आहे. शेतकरी हा संस्कृतीचा घटक मानला गेला तर त्याचे अनेक प्रश्न सामूहिकरीत्या सोडवता येतील.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर