शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही  : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:36 IST

अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

ठळक मुद्देभांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही  : राजू शेट्टीफास या कांदबरीचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे हिंदीतील प्रसिद्ध कांदबरीकार संजीव यांच्या फाँस या कादंबरीचे बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या मराठीतील अनुवादीत ‘फास’ या कांदबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे होते.महावीर महाविद्यालयातील अ‍ॅम्पी थिएटरमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, भाजी स्वस्तात मिळावी ही अपेक्षा करणं यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी काय करायचे हे तो ठरवू शकत नाही. ते अन्य जण ठरवतात. ही फार मोठी शोकांतिका असून, तो या चक्रव्यूहामध्ये अडकला आहे.

शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, मात्र साहित्य क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न क्वचितच मांडले जातात. अशा परिस्थितीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे कौतुकास्पद आहे. कृष्णात खोत म्हणाले, कोणत्याही लेखकाला भाषा, प्रांत यांचे बंधन नसते. साहित्य हे व्यवस्थेविषयीचा राग व्यक्त करत असते.नामदेव माळी म्हणाले, फास ही अनुवादित कादंबरी शेतकऱ्यांच्या फासापुरतीच सीमित राहत नाही, तर समाजातील जातिव्यवस्था, विसंगत परिस्थितीवरही भाष्य करते. लेखक बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, लेखक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री कासोटी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. आभार डॉ. विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संस्कृतीचा घटकसध्या दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तशीच परिस्थिती भविष्यात अन्नासाठी करावी लागेल. अशी संहारक परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, तर आज शेतकऱ्याला सर्वांनी मिळून जगविण्याची गरज आहे. शेतकरी हा संस्कृतीचा घटक मानला गेला तर त्याचे अनेक प्रश्न सामूहिकरीत्या सोडवता येतील.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर