शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

रत्नागिरी : यंत्रणांनीच घेतला विलास केळकर यांचा बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:39 IST

देशद्रोहाचा आरोप असलेल्यांनाही चांगली वागणूक मिळते, मग लाच घेतल्याच्या आरोपाखालील माणसाबाबत सरकारी यंत्रणांची इतकी हेळसांड का, असा प्रश्नही केळकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्देयंत्रणांनीच घेतला विलास केळकर यांचा बळी?नेमके उपचारच न झाल्यामुळे प्राण वाचू शकले नाहीत, पत्नीने केला प्रश्न

रत्नागिरी : पोलीस कोठडीत असलेल्या विलास केळकर यांना योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळेच त्यांचा बळी गेला असल्याचा आक्रोश त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. आरोपी आहे, या कारणास्तव खासगी रूग्णालय, खासगी रूग्णवाहिका टाळण्यात आली आणि सरकारी यंत्रणांनी नेहमीप्रमाणेच आपली दिरंगाई दाखवली.

त्यामुळे मेंदूत रक्तस्राव झालेल्या केळकर यांच्यावर नेमके उपचार खूप उशिराने सुरू झाल्याचा आक्षेपही नातेवाईकांनी घेतला आहे. देशद्रोहाचा आरोप असलेल्यांनाही चांगली वागणूक मिळते, मग लाच घेतल्याच्या आरोपाखालील माणसाबाबत सरकारी यंत्रणांची इतकी हेळसांड का, असा प्रश्नही केळकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आले. शनिवारी रात्री रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना परत पोलीस कोठडीत नेण्यात आले.

रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजता पुन्हा जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मेंदूत रक्तस्राव झाल्याच्या संशयामुळे त्यांचे सिटी स्कॅन करणे गरजेचे होते. ती व्यवस्था जिल्हा रूग्णालयात नाही. त्यामुळे खासगी रूग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली.केळकर हे आरोपी असल्याने त्यांना खासगी रूग्णालयात नेता येणार नाही, अशी माहिती रूग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांच्या गाडीत बसवलेल्या केळकर यांना परत रूग्णालयात नेण्यात आले. खासगी रूग्णालयात नेता येणार नाही तर रत्नागिरीत उपचार होऊ शकणार नाहीत, या कारणास्तव त्यांना कोल्हापूरला सीपीआरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी खासगी रूग्णवाहिका चालणार नाही, अशीही टूम काढण्यात आली. त्यामुळे सकाळी १0.२0 ते १0.३0 वाजता १0८ क्रमांकाच्या सुविधेशी संपर्क साधण्यात आला.केळकर यांच्यावर लगेच उपचार होणे आवश्यक असतानाही रूग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याकडे लक्ष दिले गेले नाही. १0८ क्रमांकाची रूग्णवाहिका तब्बल सव्वाचार तासांनी २.४५ वाजता उपलब्ध झाली. त्यानंतर त्यात आॅक्सिजन भरून रूग्णवाहिका कोल्हापूरकडे रवाना झाली. मात्र मलकापूरला या रूग्णवाहिकेतील आॅक्सिजन संपला. त्यानंतर आॅक्सिजन भरून ही रूग्णवाहिका सीपीआरकडे रवाना झाली.केळकर यांच्या दुर्दैवाचे फेरे त्यानंतरही संपले नाहीत. सीपीआरमध्ये केळकर यांना दाखलच करून घेण्यात आले नाही. येथे उपचार होणार नाहीत, असे सांगून तब्बल दोन तास रूग्णवाहिका आवारातच उभी होती आणि केळकर रूग्णवाहिकेतच होते. मेंदूतील रक्तस्रावाबाबत त्यांच्यावर उपचारच झाले नाहीत. तेथे उपचार होऊ शकत नसल्याने त्यांना खासगी रूग्णालयात हलवणे गरजेचे झाले.मात्र केळकर हे आरोपी असल्याने न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना हलवता येणार नाही, असा मुद्दा पुढे आला. त्यानंतर रत्नागिरीतील संबंधितांनी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान या हालचाली करून न्यायालकडून संमत्ती मिळवली आणि त्यानंतर केळकर यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र इतके तास त्यांच्यावर नेमके उपचारच न झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.केळकर यांची पत्नी आणि मुलगा या दोघांचाही आक्रोश न पाहावणारा होता. योग्य वेळत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असला. त्यांना उपचारही वेळेत न देण्यासाठी ते देशद्रोही होते का? त्यांनी कोणाचे खून केले आहेत का? असा प्रश्न त्यांच्या पत्नीने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी