शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रेशन दुकानांत आता दुग्ध पदार्थ, खते, बियाणे, भाजीपालाही-गिरीष बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:30 IST

रेशन व्यवस्थेतील बायोमेट्रिक प्रणालीमुळे राज्यात सुमारे १२ लाख बोगस रेशनकार्ड मिळाली असून, ती तातडीने रद्द करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देराज्यातील १२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द; तीन लाख ८० हजार टन धान्य वाचले; नव्या ९९ लाख लोकांना वाटप करणार

कोल्हापूर : रेशन व्यवस्थेतील बायोमेट्रिक प्रणालीमुळे राज्यात सुमारे १२ लाख बोगस रेशनकार्ड मिळाली असून, ती तातडीने रद्द करण्यात आली आहेत. त्यातून वाचलेले सुमारे तीन लाख ८० हजार मेट्रिक टन धान्य नवीन सुमारे ९९ लाख लोकांना वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रेशन दुकानातून आता धान्याबरोबरच आरे कंपनीची दूध उत्पादने, खते, बी-बियाणे, भाजीपाला, उज्ज्वला गॅसचे सिलिंडर या वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री बापट बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील रेशन दुकानदारांच्या अनेक अडचणीतून मार्ग काढला आहे. त्यासाठी रेशन दुकानात सात गोष्टी ठेवण्याची परवानगी दिली आहे; पण कीटकनाशक ठेवण्यास प्रतिबंध केला आहे. रेशन दुकानदारांचा वारसा हक्काचा प्रश्नही निकाली काढला आहे. त्यासाठी रेशन दुकानधारकांना सुनावणीसाठी मुंबईला फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता या सुनावण्या ज्या-त्या जिल्ह्यांत निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. यातून राज्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार प्रकरणे निकाली काढली आहेत.गोदामातून टेम्पो थेट दुकानातचरेशनप्रणालीमध्ये पूर्ण पारदर्शी व्यवहार ठेवण्याचा जास्तीत-जास्त प्रयत्न केला आहे. धान्याच्या गोदामातून धान्य भरून गेलेला टेम्पो थेट रेशन दुकानामध्येच जाईल याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी राज्यामध्ये वर्षअखेरपर्यंत पुरवठा खात्याची सुमारे २६५ गोदामे पूर्ण होतील. पुरवठा विभागात आमूलाग्र बदल करून कार्यप्रणाली आधुनिक केली आहे. त्यामध्ये गोदामातून धान्य घेऊन जाणारा टेम्पो कोठे थांबतो, हे सहजपणे समजू शकते. शिवाय दुकानदारांना आता आॅनलाईन पेमेंट करता येते.जिल्ह्यात ९४ हजार नवीन लोकांना धान्य मिळणारराज्यात १२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्यानंतर बचत झालेले धान्य हे नवीन ९९ लाख लोकांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ९४ हजार नवीन लोकांना लाभ होणार आहे. त्यामध्ये शहरातील सुमारे ६५ हजार, तर ग्रामीण भागातील २९ हजार लोकांचा समावेश आहे.मका १४ रुपये खरेदी, रुपयाने विक्री1 रेशन दुकानात मिळणाºया मकाबाबत बोलताना मंत्री बापट म्हणाले, सुमारे १४ रुपये प्रतिकिलो रुपये दराने शासन खरेदी करून ते रेशनवर प्रतिकिलो १ रुपये दराने देत आहे. मका न घेतल्यास गहू व तांदूळ मिळणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मकाऐवजी ज्वारी देण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.2 रॉकेल विक्रेत्यांकडे गॅस एजन्सी देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील १०० टक्के रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन देण्यात आले असून, त्या मशीनबाबत दुकानदारांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. काही डोंगराळ भागात मशीनला रेंज नसल्यामुळे तेथे पावती करण्यास परवानगी दिली आहे. सर्वांगीण विकास आणि दुकानदारांना मदत करणे, हाच हेतू बायोमेट्रिक प्रणालीचा आहे.जादा तूरडाळ इतर राज्यांतराज्यात यंदा तूरडाळीचे उत्पादन जादा झाले आहे. गोदाममालकांचे सुमारे १९ कोटी रुपये देणी भागविल्यानंतर ती तूरडाळ आता गोदामात सुरक्षित ठेवली आहे. जादा तूरडाळ ठेवण्यास जागा शिल्लक नाही अशी इतर राज्यांत पाठविली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgirish bapatगिरीष बापट