शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशनचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:37 IST

महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाºया दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे

ठळक मुद्देशासनाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश : हयगय करणाऱ्यांवर होणार कारवाई

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेवून नंतर बंद करणाºया दुकानदारांना यामुळे चाप बसणार आहे.राज्यभरात १ कोटी ५४ लाख ९७ हजार ६११ रेशनकार्डधारक आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख ४९ हजार ५२१ रेशनकार्डधारक असून, रेशन दुकानांची संख्या १५७२ आहे. रेशनवर गहू, तांदूळ, डाळ असे धान्य ग्राहकांना वाटप केले जाते; परंतु बहुतांश दुकानदार हे रेशनवरील धान्य महिन्यातील काही दिवसांपर्यंतच वाटून नंतर दुकान बंद करणे किंंवा धान्य शिल्लक न ठेवणे असे प्रकार करीत आहेत.

या संदर्भात सन २०१७च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार शिवाजीराव नाईक यांनी, रेशन दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सक्ती व जबाबदारी रेशन दुकानदारांवर टाकावी, अशी सूचना केली होती. त्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अवर सचिव पी. जी. चव्हाण यांनी नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये ग्राहक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशनवरील धान्य घेण्यास आल्यावर त्याला धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्यास संबंधित दुकानदारांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे दुकानदारांना कळविण्यात आल्याचे म्हटले आहे.

ग्राहकाच्या सोयीसाठी रेशन दुकाने आहेत. त्यामुळे ती महिनाभर सुरू असली पाहिजेत, अशीच ग्राहकांची भावना आहे. परंतु बहुतांश ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही दुकाने सुरू नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुकानदारांना आता महिनाभर दुकानात थांबून ग्राहकांना धान्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. 

 

शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य विक्री सुरू असते. तसेच ‘धान्य घेऊन जावे’ असे मोबाईलद्वारे ग्राहकांना कळविणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा असावा.- चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय