शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रसिक हा न लिहिणारा लेखक : म्हात्रे

By admin | Updated: January 5, 2015 00:35 IST

ग्रंथ महोत्सव समारोप : सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे अनोखे दर्शन; हजारो सातारकरांची उपस्थिती

सातारा : ‘पुस्तकांचा गंध तुमच्यापर्यंत पोहोचल्यास ग्रंथ महोत्सव समृद्ध होईल, कारण रसिक हा न लिहिणारा लेखक असतो,’असे मत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सातारकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात त्यांनी साथ दिली. येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवातील समारोपाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कवी म्हात्रे बोलत होते. यावेळी वात्रटिकाकार रामदास फुटाणे, पुणे विभागाचे निवडणूक आयुक्त श्याम देशपांडे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, प्रदीप कांबळे, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने आदी उपस्थित होते.म्हात्रे म्हणाले, ‘इथे काही असा बोर्ड लावला नाही, की हे संमेलन गरिबांचे आहे की शेतकऱ्यांचे. कारण याच्याही पलीकडे जी माणसं काळजातील गुपित अनेक वर्षे आपल्या मनात ठेवतात. ते काळजातील श्रवण पुस्तक रूपाने टाकावं, असं त्यांना वाटतं. तेव्हाच लेखक तयार होतात. आपल्याच मातीतील लोक इतकी मोठी होतात, त्याचा पुरावा देण्यासाठी हे संमेलन आहे. सगळ्या लेखकांचा प्रभाव आमच्यावर आहे, असेही म्हात्रे यांनी सांगितले. म्हात्रे पुढे म्हणाले, अरुण म्हात्रे ऐरवी कुठेतरी कारकुनी करीत राहिला असता. रामदास फुटाणे कुठेतरी शाळेत टिचर म्हणून काम करत असते. मात्र, या सगळ्यांना कवितेचा स्पर्श झाला आणि ते झळाळून उठले. ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून छोट्या-छोट्या गावांत पुस्तके गेली तरी खूप मोठी क्रांती होईल. तुम्हाला प्रश्न विचारण्याची ताकद हे पुस्तकच देणार आहे. ग्रंथ महोत्सव कशासाठी घ्यावा, हे माझ्याकडे चांगले उत्तर आहे. आजची पिढी खूप बदलली आहे. परवा मी घरी गेलो, त्यावेळी माझा मुलगा हसायला लागला. मी काहीच केले नाही. घरात गेलो, चप्पल काढली. आणि तो हसायला लागला. मी त्याला विचारलं की तू का हसतोयस. तर तो म्हणाला, ‘आजच आम्हाला सरांनी शिकवलंय. संंकटांना हसत सामोरे जायचं.’ अशा पद्धतीने का जर वडिलांना संकट ठरवत असतील तर हा काळ कुठं चालला आहे, असे वाटते. त्यामुळे ग्रंथ महोत्सव हे गरजेचे आहे. ग्रंथ प्रदर्शनामध्ये पुस्तके विकत घ्यावीत. अशा ठिकाणी त्यांनी सर्व माहिती गोळा करावी. मुलांसाठी नवनवीन दालन उपलब्ध करून द्यावी. सरकारच्या गॅझेटमध्येच असे लिहिले आहे की, हा सगळा पगारच अशा प्रकारच्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये जावं. सगळ्या विद्यार्थ्यांना कला दालन उघडून द्यावी, याच्यासाठी आहे. जेव्हा शिक्षक कमी पडतात. तेव्हा तुमच्यासारखे रसिक पुढे येतात.’‘मी अभिमाने सगळीकडे सांगतो, की सातारचे जे ग्रंथप्रदर्शन आहे. हे महाराष्ट्रात दुसरीकडे कोठेही होत नाही. साहित्य संमेलन तुमच्याकडे यावं, याच्यापेक्षा त्याचे नेतृत्व सातारच्या मंडळींनी करावं. कारण कसं भरवलं जातं. हे सगळं सातारच्या संमेलनामध्ये मी पाहिलेले आहे. पुस्तकांचं संमेलन कसं असावं, याच्यासारखं उदाहरण सातारच असावं.’रामदास फुटाणे म्हणाले, ‘ग्रंथ महोत्सवात युवकांना सामील करून घ्यावे. युवकांचा ग्रंथ महोत्सवात सहभाग वाढल्यास नक्कीच परिवर्तन होईल. (प्रतिनिधी)कवितेसाठी कासचं पठारच पाहिजेतुमच्याकडे कास पठार आहे. इतकी सुंदर फुले त्यावर येतात. तर तेथे बोलण्यासाठी काही कविताही असतील. कासचे सौंदर्य काही फुलांमध्ये आहे. ही फुलं तुम्हाला आनंद देतात. फुलं सुंदर पठार निर्माण करतात, हे सगळं सांगण्यासाठी सातारचं कास पठारच पाहिजे. संमेलनाने तुम्हाला काय विचार दिला, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. एक उदाहरण आहे, जर तुम्हाला दोन रुपये मिळाले तर तुम्ही काय कराल, एका रुपयाची भाकरी घ्यायची. आणि दुसऱ्या रुपयाचं फूल घ्यायचं. म्हणजे भाकरी तुम्हाला जगवते आणि फूल तुम्हाला कसं जगायचे ते शिकविते.