शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘दक्षिण’च्या २० ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेचअमर पाटील ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट ३६ गावांपैकी २० ग्रामपंचायतींची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारणाची पहिली पायरी असणाºया ग्रामपंचायतींची सत्ता हाती ठेवल्यास २०१९ ची विधानसभा व लोकसभा सोपी जाण्यासाठी या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकत पुढील पाया भक्कम करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.विधानसभा ...

लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट ३६ गावांपैकी २० ग्रामपंचायतींची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारणाची पहिली पायरी असणाºया ग्रामपंचायतींची सत्ता हाती ठेवल्यास २०१९ ची विधानसभा व लोकसभा सोपी जाण्यासाठी या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकत पुढील पाया भक्कम करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थेट सरपंच निवडीने वेगळी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. यंदा सदस्य एका पक्षाचा व सरपंच एका पक्षाचा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याच पक्षाचा सरपंच खुर्चीत विराजमान व्हावा यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यासह शिवसेनाही आक्रमकतेने उतरली आहे.२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी खुला पुरुष-८, खुला महिला-६, ओबीसी पुरुष-१, महिला-४, अनुसूचित जाती पुरुष-१, महिला -१ असे आरक्षण आहे. खुल्या वर्गातील १४ सरपंच दावेदार असल्याने निवडणुका रंगतदार होणार हे निश्चित. दक्षिणमधील ग्रामपंचायतीवर कॉँग्रेसआडून सतेज पाटील गटाचे वर्चस्व होते. आमदार अमल महाडिक यांच्या विजयाने मधल्या काळात महाडिक गटाआडून भाजपने विस्तार वाढविण्यावर भर दिला. कॉँग्रेसच्या ताब्यात असणाºया ग्रामपंचायती ताब्यात घेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. पण ग्रामीण भागातील शिवसेनेची ताकदही दुर्लक्षित करता येणार नाही. या निवडणुकांत शिवसेनाही आक्रमकतेने उतरली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत यश न मिळाल्याने राष्टÑवादी दक्षिणेत खिळखिळी झाली आहे. अटीतटीच्या लढती होणाºया या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत महाडिक गटास भाजपची साथ मिळणार आहे. नोटाबंदी व कर्जमाफीनंतर होणाºया निवडणुकीत पक्षांच्या अस्तित्वाचा लढा होत आहे. स्थानिक नेतृत्वाला हाताशी धरत कॉँग्रेसचा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी प्रचार करताना विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. ग्रामपंचायतीआडून पाटील-महाडिक गटांत रस्सीखेच सुरू असून, दक्षिणचे राजकीय वातावरण पुन्हा चांगलेच तापले आहे.दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीवळिवडे, वसगडे, नेर्ली, विकासवाडी, कळंबा, पाचगाव, नागाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, कणेरी, कणेरीवाडी, दिंडनेर्ली, हणबरवाडी, कावणे, दºयाचे वडगाव, चुये, निगवे खालसा, उचगाव, कंदलगाव, मोरेवाडी.