शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

कोथळीत आढळला दुर्मीळ वीरगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:02 IST

कोल्हापूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर ...

कोल्हापूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा वीरगळ लेख शोधून काढला आहे. १२व्या शतकातील हा वीरगळ असून, कोथळी गावातील दोरय्या यांचा मुलगा मल्लय्यन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे या वीरगळ लेखात म्हटले आहे.प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करतात, त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. अशा वीरगळावर संबंधित वीर पुरुषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात सदर वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेले असते. वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योद्ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते.महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मीळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर आणि आगळगाव वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. खिद्रापूरचा वीरगळ लेख उत्तरकालीन शिलाहार राजवटीतील आहे.इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. या वीरगळांसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना शिरोळ तालुक्यातील कोथळी गावात कल्लेश्वराच्या मंदिरात एक वीरगळ आढळून आला. मंदिरात एका भिंतीला टेकून तीन वीरगळ ठेवले आहेत. स्त्रियांच्या रक्षणासाठी कोथळीच्या वीराने आपले सर्वोच्च बलिदान दिले. स्त्रीरक्षणार्थ मरण पावलेल्या वीराचा वीरगळ हा महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. अक्षराच्या वळणावरून आणि लेखनशैलीवरून तो १२ व्या शतकातला असावा असे अनुमान करता येते. या वीरगळ अभ्यासासाठी हम्पी विद्यापीठाचे शीलालेखतज्ज्ञ डॉ. कणवीर मन्वाचारी, बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), अमोल चिकोडे, गणेश जंगम, कुमार सुतार यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले. वीरगळावरील या लेखाच्या संशोधनाने दक्षिण महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.शिलालेख ‘हळेकन्नड’मध्येहा विरगळ हळेकन्नड लिपीत आहे. अडीच फूट ऊंच आहे. खालील भागात एक वीर पुरुष ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना आहे. वीराच्या मागे स्त्री दर्शवली आहे. कलशाकृती भागावर ध्वज आहेत. त्यानंतर टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. या लेखात कोथळी गावातील दोरय्याचा मुलगा मल्लयन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे.