शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

कोथळीत आढळला दुर्मीळ वीरगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:02 IST

कोल्हापूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर ...

कोल्हापूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्रातील दुर्मीळ वीरगळ आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा वीरगळ लेख शोधून काढला आहे. १२व्या शतकातील हा वीरगळ असून, कोथळी गावातील दोरय्या यांचा मुलगा मल्लय्यन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे या वीरगळ लेखात म्हटले आहे.प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करतात, त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. अशा वीरगळावर संबंधित वीर पुरुषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात सदर वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेले असते. वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात. मात्र, ज्या योद्ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत त्याचे नाव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते.महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मीळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर आणि आगळगाव वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत. खिद्रापूरचा वीरगळ लेख उत्तरकालीन शिलाहार राजवटीतील आहे.इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंग कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. या वीरगळांसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना शिरोळ तालुक्यातील कोथळी गावात कल्लेश्वराच्या मंदिरात एक वीरगळ आढळून आला. मंदिरात एका भिंतीला टेकून तीन वीरगळ ठेवले आहेत. स्त्रियांच्या रक्षणासाठी कोथळीच्या वीराने आपले सर्वोच्च बलिदान दिले. स्त्रीरक्षणार्थ मरण पावलेल्या वीराचा वीरगळ हा महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. अक्षराच्या वळणावरून आणि लेखनशैलीवरून तो १२ व्या शतकातला असावा असे अनुमान करता येते. या वीरगळ अभ्यासासाठी हम्पी विद्यापीठाचे शीलालेखतज्ज्ञ डॉ. कणवीर मन्वाचारी, बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), अमोल चिकोडे, गणेश जंगम, कुमार सुतार यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले. वीरगळावरील या लेखाच्या संशोधनाने दक्षिण महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.शिलालेख ‘हळेकन्नड’मध्येहा विरगळ हळेकन्नड लिपीत आहे. अडीच फूट ऊंच आहे. खालील भागात एक वीर पुरुष ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना आहे. वीराच्या मागे स्त्री दर्शवली आहे. कलशाकृती भागावर ध्वज आहेत. त्यानंतर टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. या लेखात कोथळी गावातील दोरय्याचा मुलगा मल्लयन हा स्त्रियांचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे म्हटले आहे.