शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून रंकाळा परिसर चकचकीत

By admin | Updated: October 16, 2015 23:24 IST

शिवाजी विद्यापीठाची मोहीम : कुलगुरू, पोलीस अधीक्षकांसह सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे श्रमदान; दहा टन कचऱ्याचा उठाव

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) सुमारे सहाशे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून शुक्रवारी रंकाळा तलाव परिसर स्वच्छ केला. ‘स्वच्छ भारत - स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या मोहिमेत इराणी खणीसह मोहिते खण, रंकाळा पदपथ, पतौडी उद्यान, संध्यामठाकडील उद्यान, तसेच रंकाळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, काचेच्या बाटल्या, काटेरी झुडपे असा दहा टन कचरा जमा झाला. ही मोहीम अडीच तासांहून अधिक वेळ राबविण्यात आली.मोहिमेसाठी सकाळी साडेआठ वाजता इराणी खण येथे विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी पोहोचले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा प्रमुख उपस्थित होते. पूर्वनियोजनानुसार मोहिमेला सुरुवात झाली. यात खुरपे, खराटा, फावडे, आदी साहित्य घेऊन सर्वजण श्रमदान करीत होते. कचरा उचलणे, खराटा मारणे अशी कामे डॉ. शिंदे, डॉ. शर्मा हे करीत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. त्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. खणीतून प्लास्टिक पिशव्या, कचरा, विसर्जित केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व मुखवट्यांचे अवशेष बाहेर काढण्यात आले. खणीच्या परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा गोळा केला. शिवाय अनावश्यक काटेरी झुडपे साफ केली. मोहिमेअंतर्गत सुमारे दहा टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक टी. डी. पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे २५ सफाई कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. पालिकेतर्फे दोन डंपर, एक जेसीबी, पाण्याचा टँकर, दोन धूर फवारणी यंत्रे, पाच कीटकनाशक फवारणी यंत्रे, आदी सामग्री उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये उत्साह होता. यातील अनेकांनी स्वच्छतेसाठी हातात घेतलेला झाडू, बुट्टी, खुरपे, आदी कामे करीत असतानाच मोबाईलवरून ‘सेल्फी’ टिपला. (प्रतिनिधी)ंमोहिमेत यांनी घेतला सहभागस्वच्छता मोहिमेत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’ संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, वासंती रासम, भगवान माने, अमोल मिणचेकर, प्राचार्य एस. एस. गवळी, एच. एस. वनमोरे यांच्यासह शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर महाविद्यालय, केएमसी, गोखले कॉलेज, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज आणि विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील शिक्षक, कर्मचारी व ‘एनएसएस’चे विद्यार्थी सहभागी झाले होते. भविष्यात रंकाळ्याचे चिरतारुण्य अबाधित राखण्यासाठी विद्यापीठाकडून यापुढे देखील या ठिकाणी स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपले मन तसेच पाणी कधीही गढूळ होऊ देता कामा नये. या गोष्टी जितक्या स्वच्छ व पारदर्शक ठेवाल, तितके आपले जीवन उत्तम व निरोगी पद्धतीने व्यतीत होईल.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आवाहनानुसार ८ मे रोजी विद्यापीठाने स्वच्छता मोहीम सुरू आहे. गणेश विसर्जनानंतर इराणी खण परिसरातील स्वच्छता करणे आवश्यक असल्याने या ठिकाणी मोहीम घेतली.- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ