शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

रांगणा किल्ला प्रसिद्धीपासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:19 IST

शिवाजी सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांनी ऐतिहासिक घटना जिवंत ठेवल्या आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर ...

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांनी ऐतिहासिक घटना जिवंत ठेवल्या आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा ठेवा लाभलेला जिल्हा आहे. किल्ला हा मराठी माणसांच्या रक्तात भिनला आहे. काही किल्ले प्रसिद्ध तर काही प्रसिद्धीपासून वंचित आहेत.भुदरगड तालुक्यातील 'रांगणा' किल्ला असाच एक इतिहासकालीन किल्ला प्रसिद्धीपासून वंचित आहे. निसर्गाच्या अद्भूत लीला पाहाव्यात तर रांगणा परिसराला भेट देणे गरजेचे आहे.गर्द हिरवी वनराई, असंख्य दुर्मीळ वन्यजीव, पशु-पक्षी, दुर्मीळातील दुर्मीळ अशा वनौषधी वनस्पती या परिसरात मुबलक प्रमाणात आढळतात. डोंगर-दऱ्यांनी आणि जंगलाने वेढलेला रांगणा गड हा घाटमाथा आणि कोकणाच्या नैसर्गिक सीमारेषेवर वसलेला आहे.‘गडकोटांचा राजा’ अशी बिरुदावली ज्या राजाला लावली जाते त्या राजा भोज (द्वितीय) यांनी अनेक गड उभारलेत. त्यातीलच एक रांगणा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार दोनशे सव्वीस फूट उंचीची हा गड आज इतिहासात डोकावून पाहता रायगडनंतर मराठा दौलतीच्या राज्य कारभाराची १९ महिने धुरा वाहणाºया रांगणा किल्ल्याला 'मराठ्यांची दुसरी राजधानी' म्हणून इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळाले. त्याकाळी रहदारीचे आणि वेगवान लष्करी, राजकीय घडामोडीचे केंद्र होता. रांगण्यावरुन कोकण आणि घाटमाथ्यावर लक्ष ठेवता येत होतेऔरंगजेबाविरुद्धच्या लढाईत रायगड पडला त्यावेळी छ. राजाराम महाराजांनी रांगणा जवळ केला. याठिकाणी त्यांनी दीड वर्षे वास्तव केले.शिलाहारवंशीय 'महामंडलेश्वर राजा भोज दुसरा' याने इ.स.११८७ मध्ये राज्याच्या सुरक्षिततेसाठी बांधलेल्या पंधरा किल्ल्यांपैकी एक म्हणजे रांगणा किल्ला. आठशे वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून आजही खंबीरपणे उभा आहे. खुद्द छत्रपतींनी 'प्रसिद्धगड' असे नाव देऊनही 'रांगणा' म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याचा उल्लेख चिटणीसांच्या बखरीत 'बेलाग आणि मजबूतगड' असा येतो.रांगण्याच्या पडक्या अवस्थेतील खुणा होऊन राहिलेल्या दारुगोळ्याची कोठारे, घोड्यांचे तबेले, पागा दिसतात. गडावर पूर्वी सात दरवाजे होते, असे सांगतात पण त्यातील बरेचशे दरवाजे सध्या नष्ट झाले आहेत. गडावरील इतिहास प्रसिद्ध 'हत्ती बुरुज' कोसळला आहे. तोफही तट कोसळल्याने खोल दरीत पडल्या आहेत. कोकणचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हे एक विलक्षण आल्हाददायक आहे.