शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

Ramdas Athawale: “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार”; रामदास आठवलेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:04 IST

Ramdas Athawale: या हल्ल्याशी भाजपचा संबंध नसून, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकारने योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक मुंबईतील निवसास्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्लामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीसह भाजप नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले. यानंतर आता रिपाइंचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवत, शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे, या शब्दांत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. 

कोल्हापुरात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब गंभीर आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत होते. आताच्या सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. हे सरकार आल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन करत असल्याचे आठवले यांनी नमूद केले. 

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. भाजपची याचा काही संबंध नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही. एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यास हरकत नाही, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. एसटी ही ग्रामीण भागात देणारी सेवा असून, एसटीला मदत करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे विलिनीकरण व्हावे, ही आमची भूमिका आहे, असे नमूद करत काही असले तरी शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे हे निषेधार्हच आहे. या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली. 

दरम्यान, याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहे आणि स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ही घटना परत व्हायला नको, याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार पुढे लक्ष देईल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी