शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:16 IST

राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत.

सांगली - अजय देवगणच्या सिंघम चित्रपटात जयकांत शिक्रे या खलनायकाची भूमिका केल्यानंतर देशभरात प्रकाशझोतात आलेले दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश यांनी चक्क राजू शेट्टींच्या प्रचारसभेला हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रकाश राज यांनी राजू शेट्टींसाठी प्रचार केला. विशेष म्हणजे प्रकाश राज हेही या निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचाराला त्यांनी हातगणंगलेत हजेरी लावली. 2014 मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी एनडीए सरकारमधून बाहेर पडले. राज्यातही त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं कुटुंबीयदेखील प्रचारात सक्रीय दिसत आहेत. राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेच्या कामाबद्दल प्रकाश राज यांनी कौतुक केलं आहे. त्यामुळेच, प्रकाश राज हे अपक्ष उमेदवार असतानाही राजू शेट्टींच्या प्रचारासाठी हातकणंगले मतदारसंघात दाखल झाले. यावेळी, त्यांनी जाहीर सभेला संबोधितही केले. 

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यामुळेच प्रचारतोफा थंडावण्याच्या 2 दिवस अगोदर राज यांनी राजू शेट्टींच्या प्रचारार्थ सभा घेतली. राजू शेट्टी हे गेल्या 2 निवडणुकांमध्ये येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदा विजयाची हॅटट्रीक साधण्याची त्यांना संधी आहे. राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचे आव्हान आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Prakash Rajप्रकाश राजElectionनिवडणूक