शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

Raju Shetty: राजू शेट्टींची पदयात्रा आज नृसिंहवाडीत येणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त, रेस्क्यू फोर्सला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 09:05 IST

पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत.

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा पूरग्रस्तांना न्याय द्या या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून काढलेली पदयात्रा आज नृसिंहवाडीत पोहचणार आहे. नृसिंहवाडीत जलसमाधी घेणार अशी घोषणा केल्यामुळे प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. दि. 1 सप्टेंबर पासून प्रयाग चिखली येथे या पंचगंगा नदीच्या परिक्रमा पदयात्रेची सुरूवात केली असून 4 दिवसात ९० किमीचे अंतर कापून अब्दुललाट येथे काल रात्री उशीरा ही पदयात्रा पोहचली आहे. 

पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत. आज दुपारी 3 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन होणार आहे. 

पूरग्रस्तांच्या मागण्या-१) २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकर्यांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा.२) पूरग्रस्तांचे मागणीप्रमाणे सोयीचे पुनवर्सन करा.३) कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाजवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा.४) पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची   सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा.५) २००५ ते २०२१ पर्यंत ४ मोठे महापूर आले आहेत. या महापुरामुळे नदीकाठचे अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तातडीने अभ्यासगट नेमून त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी. ६) महापुरामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकर्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या आहेत. विहीरी खचलेल्या आहेत. शेडनेट मोडकळून पडल्या आहेत. यंत्रमागधारकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना सरकारने तातडीने विनाअट नुकसान भरपाई द्यावी. 

७) महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे. त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सानुग्रह अनुदान देण्यात यावे.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी