शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

राजू शेट्टी राज्य पिंजून काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:49 IST

कोल्हापूर : दोन वर्षे देशपातळीवरील शेतकऱ्यांचा असंतोष एकवटणारे खासदार राजू शेट्टी हातकणंगले व सांगली या घरच्या मतदारसंघांची जबाबदारी शिलेदारांवर ...

कोल्हापूर : दोन वर्षे देशपातळीवरील शेतकऱ्यांचा असंतोष एकवटणारे खासदार राजू शेट्टी हातकणंगले व सांगली या घरच्या मतदारसंघांची जबाबदारी शिलेदारांवर सोपवून रविवार (दि. ७)पासून १५ दिवस महाराष्ट्राच्या प्रचार स्वारीवर निघत आहेत. पदयात्रा, कॉर्नर सभा, जाहीर सभांच्या माध्यमातून ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठविणार आहेत. शेट्टी यांच्या जाहीर सभेची सुरुवात आज, शुक्रवारी वर्धा येथे राहुल गांधी यांच्या सभेतून होणार आहे.खासदार शेट्टी यांची प्रतिमा ‘देशपातळीवरील शेतकऱ्यांचा नेता’ अशी झाली असल्याने त्यांना प्रचारासाठी देशभरातून मागणी आहे. तथापि, त्यांनी सध्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविल्याने ‘स्वाभिमानी’कडून नियोजन तयार केले आहे. महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’ एक घटकपक्ष आहे. शरद पवार यांच्या नियोजनानुसार सध्या महाआघाडीतील बड्या नेत्यांना ‘स्टार प्रचारक’ म्हणून सभांमध्ये उतरविले जात आहे. हातकणंगले ‘स्वाभिमानी’चा गड आहे; तर सांगलीत प्रथमच ‘स्वाभिमानी’ लढत आहे. या जागा ‘स्वाभिमानी’साठी महत्त्वाच्या आहेत; पण दोन मतदारसंघांत शेट्टींना अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या प्रतिमेचा उपयोग इतर शेतकरीबहुल मतदारसंघांत करून घेण्याचे महाआघाडीचे धोरण आहे.रविवारपासून २१ एप्रिलपर्यंत ते राज्यभरातील प्रचारसभा घेणार आहेत. हातकणंगले व सांगलीच्या प्रचाराची जबाबदारी शरद पवार, खासदार उदयनराजे, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. योगेंद्र यादव, रामपाल जाट, राकेश टिकैत, व्ही. के. सिंग,डॉ. सुनीलम हेसुद्धा प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष तूपकर यांनी दोन्ही मतदारसंघांत मुक्काम ठोकत जोडण्या लावण्याचे धोरण ठेवले आहे. त्यांना सावकर मादनाईक, जालंदर पाटील, भगवान काटे यांच्यासह विश्वासू शिलेदार मोलाची साथ देण्याचे काम करीत आहेत.राज ठाकरेंची सभा होणारराज ठाकरे यांनी ‘स्वाभिमानी’च्या सभेला येण्यासाठी होकार कळविला आहे. पहिल्या टप्प्यात १७ एप्रिलला मतदान होणाºया ठिकाणी त्यांच्या राज्यभरात नऊ जाहीर सभा होणार आहेत. दुसºया टप्प्यात १६ ते २१ एप्रिलदरम्यान हातकणंगले, सांगली, कोल्हापूरसाठी एकत्रित सभा घेण्याबाबत त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यांना तशा तारखा कळविल्या असून, त्यातून एक तारीख ते लवकरच सांगणार असल्याचे ‘स्वाभिमानी’च्या सूत्रांनी सांगितले.