शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

राजू शेट्टी कारखानदारांना फितूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

* स्वाभिमानीनेच एफआरपीवरील व्याज नको म्हणून दिले करारपत्र जयसिंगपूर : थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज नको, असे करारपत्र स्वाभिमानी ...

* स्वाभिमानीनेच एफआरपीवरील व्याज नको म्हणून दिले करारपत्र

जयसिंगपूर : थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज नको, असे करारपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याला लिहून दिले आहे, असा आरोप आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेने पत्रकार बैठकीत केला. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेट्टी हे साखर कारखानदारांना फितूर झाले आहेत, असादेखील आरोप संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केला.

उसाच्या थकीत एफआरपीवर १५ टक्के व्याज मिळावे, यासाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून लढा सुरू आहे. आरआरसीअंतर्गत साखर आयुक्तांकडून कारखानदारांवर जप्तीची कारवाई होणार होती. मात्र, माजी खासदार शेट्टी यांच्यासह सावकर मादनाईक, पं.स. सदस्य सचिन शिंदे, अण्णासाहेब चौगुले, राजश्री गावडे या शेतकरी संघटनेच्या सभासद शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीवरील १५ टक्के व्याजाची रक्कम नको, असे करारपत्रच संबंधित कारखान्याला लिहून दिले आहे, असे पुराव्यानिशी सांगून चुडमुंगे म्हणाले, साखर कारखानदारांशी संगनमत करून शेट्टी हे शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड हेदेखील कारखानदारांच्या बाजूने आहेत. ७३०० ऊस उत्पादक सभासदांनी एफआरपीवरील १५ टक्के व्याजाची रक्कम नको, असे करारपत्र लिहून दिल्याने साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई रद्द केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु १५ टक्के व्याजासाठी आमचा लढा सुरू राहणार असून, याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही चुडमुंगे यांनी सांगितले.