शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

शिवाजी पूलप्रश्नी आता खासदार एकजूट करणार पंतप्रधानांकडे लवकरच पाठपुरावा : राजू शेट्टींचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:57 IST

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्णातील खासदारांकडून दिल्लीदरबारी पुन्हा पाठपुरावा होणार आहे.

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्णातील खासदारांकडून दिल्लीदरबारी पुन्हा पाठपुरावा होणार आहे. शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी खासदार राजू शेट्टी यांनी दर्शवली. खासदार धनंजय महाडिक यांनी जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने सोमवारी (दि. ७) कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्ह्णातील खासदारांबाबतही नाराजी व्यक्त करीत ‘त्यांनी आतापर्यंत काय केले?’ अशी विचारणा केली.या खासदारांनी थेट राष्टÑपतींची भेट घेऊन शिवाजी पूलप्रश्नी वटहुकुम काढण्याबाबत विनंती करावी, अशी मागणीही यावेळी झाली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने खासदार शेट्टी, संभाजीराजे व महाडिक यांना या प्रश्र्नाच्या सोडवणूकीसाठी तुम्ही काय करणार आहात अशी विचारणा नव्याने केली.खा शेट्टी म्हणाले,‘ पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी यापूर्वी अनेक वेळा केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मनावर घेऊन हे काम पूर्ण करण्याची गरज आहे. हा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कॅबिनेटच्या माध्यमातून पुलाच्या परवानगीसाठी राष्टÑपतींकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्णातील खासदारांना घेवून लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊ’खासदार महाडिक म्हणाले, ‘ पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला असून, अजूनही तो सुरू आहे. राष्टÑपतींच्या अधिकारात वटहुकुम निघण्यासाठी गेल्या महिन्यातच पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राष्टÑपतींना अहवाल पाठवावा, अशी मागणी केली आहे. जून महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात पुलाच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न निकाली निघेल, अशी खात्री आहे. कृती समितीने थोडे संयमाने घ्यावे. जनतेची गैरसोय व त्रास होईल असे आंदोलन करू नये.’खासदार संभाजीराजे म्हणाले,‘ खासदार झाल्यानंतर प्रथमच दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेऊन शिवाजी पूलप्रश्नी गांभीर्य सांगून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर प्रधान सचिव मिश्रा यांनाही भेटून पाठपुुरावा केला होता. आपल्या प्रयत्नांमुळेच इतिहासात प्रथमच ‘पुरातत्त्व’चा कायदा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृती समितीने खासदारांवर अविश्वास दाखवू नये. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांना पत्र देऊन राष्टÑपतींनी वटहुकुम काढण्याबाबत कॅबिनेटतर्फे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली आहे.’