शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शिवाजी पूलप्रश्नी आता खासदार एकजूट करणार पंतप्रधानांकडे लवकरच पाठपुरावा : राजू शेट्टींचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:57 IST

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्णातील खासदारांकडून दिल्लीदरबारी पुन्हा पाठपुरावा होणार आहे.

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्णातील खासदारांकडून दिल्लीदरबारी पुन्हा पाठपुरावा होणार आहे. शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी खासदार राजू शेट्टी यांनी दर्शवली. खासदार धनंजय महाडिक यांनी जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने सोमवारी (दि. ७) कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्ह्णातील खासदारांबाबतही नाराजी व्यक्त करीत ‘त्यांनी आतापर्यंत काय केले?’ अशी विचारणा केली.या खासदारांनी थेट राष्टÑपतींची भेट घेऊन शिवाजी पूलप्रश्नी वटहुकुम काढण्याबाबत विनंती करावी, अशी मागणीही यावेळी झाली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने खासदार शेट्टी, संभाजीराजे व महाडिक यांना या प्रश्र्नाच्या सोडवणूकीसाठी तुम्ही काय करणार आहात अशी विचारणा नव्याने केली.खा शेट्टी म्हणाले,‘ पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी यापूर्वी अनेक वेळा केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मनावर घेऊन हे काम पूर्ण करण्याची गरज आहे. हा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कॅबिनेटच्या माध्यमातून पुलाच्या परवानगीसाठी राष्टÑपतींकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्णातील खासदारांना घेवून लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊ’खासदार महाडिक म्हणाले, ‘ पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला असून, अजूनही तो सुरू आहे. राष्टÑपतींच्या अधिकारात वटहुकुम निघण्यासाठी गेल्या महिन्यातच पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राष्टÑपतींना अहवाल पाठवावा, अशी मागणी केली आहे. जून महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात पुलाच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न निकाली निघेल, अशी खात्री आहे. कृती समितीने थोडे संयमाने घ्यावे. जनतेची गैरसोय व त्रास होईल असे आंदोलन करू नये.’खासदार संभाजीराजे म्हणाले,‘ खासदार झाल्यानंतर प्रथमच दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेऊन शिवाजी पूलप्रश्नी गांभीर्य सांगून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर प्रधान सचिव मिश्रा यांनाही भेटून पाठपुुरावा केला होता. आपल्या प्रयत्नांमुळेच इतिहासात प्रथमच ‘पुरातत्त्व’चा कायदा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृती समितीने खासदारांवर अविश्वास दाखवू नये. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांना पत्र देऊन राष्टÑपतींनी वटहुकुम काढण्याबाबत कॅबिनेटतर्फे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली आहे.’